बीड स्पीड न्यूज
जमिनीच्या वादातून महिलेचा खून करून मृतदेह जमिनीत पुरला; तिघे अटकेत
आष्टी_ जमिनीच्या वादातून ४२ वर्षीय महिलेचा खून करुन मृतदेह जमिनीत गाडून पुरावा नष्ट केल्याची घटना आष्टी तालुक्यातील येथे बुधवारी (दि.०२) रात्री उघडकीस आली. याप्रकरणी तिघांवर खुनाचा नोंदवून त्यांना अटक करण्यात आली.मंदा हिराभाऊ गायकवाड (वय ४५) असे त्या मृत महिलेचे नाव आहे. भरत गायकवाड (रा. वटणवाडी), जावई प्रल्हाद घुमरे आणि त्याचा मित्र सुनिल गंगार्डे (दोघे रा. घाटापिंपरी) या तिघांनी जमीन आमच्या नावावर कर असा सतत तगादा मंदाबाईकडे लावला होता. यातूनच त्यांनी ३ नोव्हेंबर २०२१ रोजी रात्री मंदाबाईला शेतात तुरीला पाणी देण्याच्या बहाण्याने घेऊन जाऊन तिचा खून करून मृतदेह जमिनीत पुरुन टाकल्याचे बुधवारी निष्पन्न झाले. याप्रकरणी मंदाबाईचा भाऊ केरु किसन चितळे याच्या फिर्यादीवरुन तिन्ही आरोपींवर आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.
0 टिप्पण्या