Subscribe Us

header ads

सामाजिक परिवर्तनाला गती देणारे ‘राजर्षी शाहू’; राजर्षी शाहू महाराज’ जयंतीत अमोल गुर्ले यांचे प्रतिपादन

बीड स्पीड न्यूज 


सामाजिक परिवर्तनाला गती देणारे ‘राजर्षी शाहू’

राजर्षी शाहू महाराज’ जयंतीत अमोल गुर्ले यांचे प्रतिपादन

बीड / प्रतिनिधी-: सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी तसेच  समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक प्रगतीसाठी लढा देत सामाजिक परिवर्तनाला गती देण्याचे कार्य राजर्षी शाहू महाराजांनी केले. असं प्रतिपादन सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल गुर्ले यांनी व्यक्त केलं. बीड शहरातील सावंत प्लाझा, मित्र नगर चौकाजवळ शिवाजी नगर येथे बार्टी मार्फत सुरु असलेल्या सम्राट प्रतिष्ठान संचलित छत्रपती राजर्षी शाहू स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र येथे ‘राजर्षी शाहू महाराज’ जयंतीनिमित्त मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना अमोल गुर्ले बोलत होते. यावेळी सम्राट प्रतिष्ठान संचलित छत्रपती राजर्षी शाहू स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे संचालक राहुल वाघमारे, केंद्रप्रमुख  यशवंत वाव्हळकर, दैनिक पुण्यभूमीचे कार्यकारी संपादक सुनिल डोंगरे, बहुजन समाज पार्टीचे प्रशांत वासनिक,अनिल डोंगरे, पोलीस कर्मचारी सचिन साळवे, नितीन  वडमारे, निखिल गोडसे, सुजाताई वासनिक महामानव अभिवादन ग्रुपचे सर्व सदस्य,आदींची प्रमुख उपस्थिती होती.पुढे बोलताना सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल गुर्ले  म्हणाल्या की, 

महात्मा फुले यांच्या सामाजिक व शैक्षणिक सुधारणेचा वारसा खऱ्या अर्थाने राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी पुढे चालवला. राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृतिशील राजे होते. शिक्षणाला त्यांनी प्रथम प्राधान्य दिले. म्हणून विद्यार्थ्यांनो महापुरुषांचे विचार आणि कार्य आत्मसात करत अभ्यासात सातत्य ठेवले तर कोणत्याही परीक्षेत यश मिळविणे अवघड नाही. सर्वसामान्य विद्यार्थी सुध्दा युपीएससी, एमपीएससी परीक्षेत यश मिळवू शकतो. प्रत्येक विद्यार्थ्यांने अभ्यासात सातत्य ठेवून पूर्ण कार्यक्षमतेने प्रयत्न करावेत असे मत साहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल गुर्ले यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक व सुत्रसंचलन प्रा.अमोल क्षीरसागर यांनी केले  संचलन प्रा.भरत खेत्रे यांनी तर आभार प्रा. शिवाजी रुपनर यांनी व्यक्त केले.या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सम्राट प्रतिष्ठान संचलित राजर्षी शाहू स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन केंद्राचे कार्यालयीन कर्मचारी ग्रंथपाल सचिन काकडे, प्रा.प्रतिक्षा हिवरकर, प्रा. देवेंद्र कांबळे,क्रीडा शिक्षक सूरज साळवे,  विनोद जोगदंड, मुकेश निसर्गंध यांनी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा