माजलगाव प्रकल्पातूनही मोठा विसर्ग सुरू आहे. अंबाजोगाई, केज आणि परळी तालुक्यातील अनेक गावांना पाण्याने वेढा दिला आहे. अंबाजोगाई तालुक्यातील तडोळा गावात शिरले आहे. आपेगावातील लोकांना सुरक्षित स्थळी नेण्यासाठी एनडीआरएफचे जवान बोटसहित दाखल झाले आहेत. लातूरहूनही जादा कुमक मागवण्यात आले आहे. देवळा गावाला पाण्याने वेढा दिला आहे. परळी तालुक्यातही काही गावांना वेढा दिला आहे.केज तालुक्यामध्ये बंधारे फुटले आहेत, शेती वाहून गेली आहे, भाटुंबा, कुंबेफळ, पिसाटी, मांजरसुंबा, अंबाजोगाई रस्ते बंद करण्यात आले आहेत. अंबाजोगाई-कळंब रस्ताही बंद करण्यात आला. सावळेश्वराचा पुल पाण्याखाली आहे. बीड जिल्ह्यातील तीन तालुक्यात परिस्थिती भयंकर झाली आहे. आपेगाव येथील नागरिकांना बाहेर काढण्यासाठी सध्या बोटीचा उपयोग केला जात असला तरी हेलिकॉप्टरलाही पाचारण केले जाणार असल्याची शक्यता आहे. पालकमंत्री धनंजय मुंडे आणि लातूरचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी तशा सूचना दिल्या आहेत. संपूर्ण प्रशासन लक्ष ठेवून आहे. प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आदेशही दिले आहेत.
0 टिप्पण्या