Subscribe Us

header ads

महावितरणच्या गलथान कारभाराने घेतला मायलेकरांचा बळी!

बीड स्पीड न्यूज 


महावितरणच्या  गलथान कारभाराने घेतला मायलेकरांचा बळी!


गेवराई-: गेवराई तालुक्यातील भेंडटाकळी तांडा येथे विजेच्या तारेला चिटकून आईसह दोन लेकरांचा मृत्यू झाल्याची हदयद्रावक घटना घडली. राठोड वस्तीतील शेत शिवारात दोन लहान मुले शेतात खेळत असताना शेतात पडलेल्या विद्युत तारेचाचा शॉक लागला. त्यात दोन मुले खाली पडली त्यांना वाचवण्यासाठी गेलेल्या आईला देखील शॉक लागल्याने या घटनेत तिघाचा दुर्देवी मृत्यू झाला. महावितरणच्या गलथान कारभारामुळे तिघांचा बळी गेल्याने संताप व्यक्त होत आहे.मुतांमध्ये आई आणि दोन मुलांचा समावेश आहे. ललीता  श्रीकांत राठोड ( वय 30 वर्ष ) अभिजीत श्रीकांत राठोड (वय वर्ष 8 )  प्रशांत श्रीकांत राठोड ( वय वर्ष 11 ) असे विद्युत तारेचा शॉक लागून मृत्यू  झालेल्या आई व दोन मुलांची नावे आहे. एकच घरातील तिघेजण मृत्यू पावल्यामुळे भेंड टाकळी परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा