बीड स्पीड न्यूज
प्रतिनिधी नवनाथ गोरे
वाकनाथपुर प्रतिनिधी_खंडेश्वरी ते खांडे पारगाव हा रस्ता इतका खराब झाला आहे की गाडी खड्ड्याच्या बाहेर निघतच नाही खड्डा चुकवण्याच्या नादात अनेक अपघात होत आहेत. आणि झालेही आहेत.हा रस्ता नागरिकांच्या जीवावर बेतत आहे. तरीही प्रशासन या कडे दुर्लक्ष करत आहे.कोणाला दवाखान्यात ही लवकर घेऊन जाता येत नाही खंडेश्वरी ते पिंपरी फाटा येथे एक वर्षापासून रस्त्याच्या बाजूला खडी टाकलेली आहे काही भाग हा नुसता खडी आणि डांबर टाकून बनवलेला आहे. या
रस्त्यामुळे नागरीकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. या सर्व गावातील नागरिकांनी मागणी करून देखील या रस्त्याचे काम पूर्ण होत नाही. रात्री अपरात्री या रस्त्याने हमेशा रहदारी सुरु असते रात्री खड्डा न दिसल्याने अनेक अपघात होऊन नागरीक जखमी झाले आहेत. तरी प्रशासनाने योग्य ती दखल घेऊन या रस्त्याचे काम लवकर पूर्ण करून घ्यावे आणि होणारे अपघात टाळावे अशी या भागातील सर्व नागरिकांची मागणी आहे.
0 टिप्पण्या