Subscribe Us

header ads

...तर पीक विमा कंपन्यांच्या मुसक्या आवळू ! -आ.संदीप क्षीरसागर

बीड स्पीड न्यूज 

बीड (प्रतिनिधी):- निकष आणि मापदंडाचे फासे टाकून शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचा पीक विमा देण्यास टाळाटाळ करणाऱ्या पीक विमा कंपन्यांच्या कारभाराविरुद्ध किसान सभेच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या पीक विमा संघर्ष दिंडी आपल्या बीड शहरात आली असता त्यांच्या समस्या व मागण्या एकूण घेण्यासाठी आंदोलनस्थळी आ. संदिप भैय्या क्षीरसागर यांनी भेट  दिली.मी स्वतः शेतकरी पुत्र असल्यामुळे 

बळीराजाच्या या आंदोलनाला माझे आंदोलन समजत एक आमदार म्हणून नव्हे तर शेतकरी पुत्र म्हणून आंदोलन स्थळी उपस्थित राहिलो. बळीराजाच्या समस्या समजून घेत पीक विमा कंपन्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी शासनदरबारी प्रयत्न करणार असल्याचा शब्द उपस्थित शेतकऱ्यांना आ. संदिप भैय्या क्षीरसागर यांनी दिला.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, आमदार 

प्रकाशदादा सोळुंके साहेब यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत पीक विमा कंपन्यांच्या चुकीच्या धोरणा विरोधात शासन स्तरावर पाठपुरावा करणार असल्याचे यावेळी आ. संदिप भैय्या क्षीरसागर यांनी सांगितले. यावेळी माजी आ. उषाताई दराडे, मा. सुशिलाताई मोराळे, अजय बुरांडे, मोहन जाधव, विशाल कदम, जयसिंह सोळुंके यांच्यासह इतर आंदोलनातील मध्यस्थ मान्यवर उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा