बीड स्पीड न्यूज
प्रतिनिधी नवनाथ गोरे
गरिबीला कंटाळुन भाटसांगवी येथे तरुणाची आत्महत्या
वाकनाथपुर प्रतिनिधी_बीड जिल्हात आत्महत्येचे सत्र सुरूच आहे. कोणत्या ना कोणत्या कारणाने आत्महत्या होत आहेत. अशीच घटना बीड तालुक्यातील भाटसांगवी येथे घडली आहे. घरात गरिबी खुप आहे शिक्षण करून देखील नोकरी मिळाली नाहीत घर चालवण्यासाठी काही हाथभार लावण्यासाठी काही काम धंदा नाही याचं गरिबीच्या नैराश्यातून (निखिल किसन बोरवडे वय २० वर्ष राहणार भाटसांगवी) या तरुणाने दिनांक २५ डिसेंबर २०२१ वार शनिवार च्या रात्री गावाशेजारीच शेतातील चींचाच्या झाडाला सुताच्या दोराच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली ही बाब रविवार दिनांक २६ डिसेंबर २०२१ रोजी सकाळी निदर्शनास आली घटनेची माहिती पिंपळनेर पोलीस ठाण्यात कळवण्यात आली घटनेची माहिती मिळताच पिंपळनेर पोलीस ठाण्याचे बिट अमलदार अवचर साहेब यांनी घटनास्थळी धाव घेतली पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी बीड येथील आरोग्य केंद्रात पाठवण्यात आला आहे. पुढील तपास पिंपळनेर पोलीस ठाण्याचे बिट अमलदार अवचर साहेब हे करत आहेत. निखिल च्या पश्चात मोठा भाऊ. आई. वडील. आज्जी आजोबा असा मोठा परिवार आहे निखिल च्या अशा जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
0 टिप्पण्या