बीड स्पीड न्यूज
आ.संदीप क्षीरसागरांचा पाठपुरावा
बीड (प्रतिनिधी):- बीड शहराला तीन दिवसाला सुरळीत पाणी पुरवठा करण्यासाठी 90 टक्के काम पुर्ण झालेल्या अमृत योजनेचे वीज कनेक्शन बीड नगर परिेषदेने थकवलेल्या 26 कोटी रूपयांच्या बीलांमुळे जोडण्यात आले नाही. मागील आठवड्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व उर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या अध्यक्षतेखाली यासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत नगर परिषद बीडने टप्प्याटप्यात थकबाकी भरेल असा प्रस्ताव सादर केला होता. उर्जा विभागाचे सीएमडी विजय सिंघल व कार्यकारी संचालक योगेश गडकरी यांच्यासोबत यासंदर्भात बैठक पार पडली. या बैठकीत लवकरच अमृत योजनेचे वीज कनेक्शन जोडण्याबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली. सबब प्रश्न मार्गी लावण्यासाठी आ.संदीप भैय्या क्षीरसागर यांचा सातत्याने पाठपुरावा सुरू आहे.बीड शहरातील गावठाण व हद्दवाढ भागात वेळेवर पाणी पुरवठा होत नाही,
माजलगावच्या धरणात पाणी साठा असतांना देखिल आणि अमृत योजनेचे काम 90 टक्के पुर्ण झालेले असतांनाही केवळ वीज कनेक्शन नसल्यामुळे सदर पाणी संकटाला सामोरे जावे लागत आहे. बीड नगर परिषदेने 26 कोटी रूपये वीज बिलापोटी महवितरणचे थकवल्यामुळे महावितरणकडून अमृतचे वीज कनेक्शन देण्यास टाळाटाळ होत आहे. बीड शहराला तीन दिवसाला सुरळीत पाणी पुरवठा होण्यासाठी व अमृत योजनेचे वीज कनेक्शन जोडण्यासाठी आ.संदीप भैय्या क्षीरसागर सातत्याने प्रयत्नशिल आहेत. सदर प्रश्न त्यांनी अजितदादा पवार, उर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या कानी टाकल्यानंतर हा प्रश्न मार्गी लागण्याच्या कामास गती आली. या बाबत उर्जा विभागाचे सीएमडी विजय सिंघल, कार्यकारी संचालक योगेश गडकरी यांच्यासोबत बैठक होवून सकारात्मक चर्चाही झाली आहे. त्यामुळे अमृत योजनेच्या वीज कनेक्शन जोडण्याचा मार्ग आता लवकरच मार्गी लागणार आहे. यावेळी आ.संदीप भैय्या क्षीरसागर समवेत माजी आ.सय्यद सलीम उपस्थित होते.
0 टिप्पण्या