बीड तालुक्यातील मौजवाडी ग्रामपंचायत बिनविरोध निवडणुक झाल्यानंतर सरपंच, ग्रा.पं.सदस्य यांना भुलधापा देत माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी त्यांचा शिवसेनेत प्रवेश प्रवेश घेत ग्रा.पं.ताब्यात आल्याचा आव आणला होता. कोणतीच विकास कामे होत नसल्याने येथील सरपंच व सदस्यांनी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांना सोडचिठ्ठी दिली आहे. मौजवाडीचे सरपंच तेजाब चव्हाण, ग्रा.पं. सदस्य अनिल जाधव, लक्ष्मण जाधव, प्रभू ढेंबरे, गोपी ढेंगे यांनी आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहिर प्रवेश केला आहे. यावेळी आ.संदिप भैय्या क्षीरसागर माजी आ.सय्यद सलीम, भाऊसाहेब डावकर, उत्तरेश्वर सोनवणे, सचिन शेळके, रमेश चव्हाण, पंकज बाहेगव्हाणकर, बाळासाहेब गुजर, राजु महुवाले, जयमल्हार बागल व आदींनी त्यांचे स्वागत करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
*गावच्या विकासाठी आ.संदिप भैया*
*सोबत -सरपंच चव्हाण*
0 टिप्पण्या