Subscribe Us

header ads

ए.टी.एम.मधून १३ लाख चोरणारी टोळीला अटक.

औरंगाबाद-: एस.बी.आय. बँकेच्या विविध ठिकाणच्या ए.टी.एम. यंत्रात बिघाड करून १३ लाख ९२ हजार रुपये काढणाऱ्या तिघांना सायबर पोलिसांनी नागपूर येथील कारागृहातून अटक केली. 
तिन्ही आरोपी हे हरयाणातील असून त्यांना चार ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश मे.मुख्य न्यायदंडाधिकारी पी. पी. मुळे यांनी दिले आहेत. 
इक्बाल खान पंछी
 (वय ३१), 
अनिस खान गफुर अहमद (२६) 
आणि मोहम्मद तालीब उमर मोहम्मद (२३) 
अशी आरोपींची नावे आहेत. 
प्रकरणात एस.बी.आय. बँकेचे सुहास दिगंबर कुलकर्णी (४७) 
यांनी फिर्याद दिली. 
त्यानुसार, १० जून रोजी फिर्यादी हे कर्तव्यावर असतांना त्यांना बँकेच्या विविध शाखेतून फोन आले, 
की तुम्ही अ‍ॅडमीन स्लीपच्या तुलनेने फिजिकल कॅश कमी का भरली ?. 
त्यामुळे फिर्यादीने चौकशी केली असता,
 बँकेच्या ए.टी.एम. मशीनमधून ए.टी.एम. लॉग मध्ये अ‍ॅटोरिव्हर्स झाले. 
हार्डवेअरमधील यांत्रिक बिघाडामुळे हे झाल्याचे लक्षात आले. 
त्यामुळे त्यांनी हर्सुल, 
टाउन सेंटर, समर्थनगर,पी.बी.बी., अमरप्रित हॉटेल, माळीवाडा येथील ए.टी.एम. मशीनचे सी.सी.टि.व्ही. फुटेज तपासले असता वरील आरोपींनी ए.टी.एम.चे सेन्सॉर व हार्डवेअर निकामी करून तब्बल १३ लाख ९२ हजार रुपये काढल्याचे समोर आले. 
प्रकरणात सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
 सहायक सरकारी वकील अॅड.मनिषा गंडले यांनी आरोपींना पोलीस कोठडी देण्याची विनंती केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा