Subscribe Us

header ads

मंत्रालयासमोर शेतकऱ्याची विष पिऊन आत्महत्या अतिशय दुर्दैवी - देवेंद्र फडणवीस

मुंबई-: मंत्रालयासमोर विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या शेतकऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. यावर आज मुंबईत माध्यमांशी बोलातान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दुःख व्यक्त करत, प्रतिक्रिया देताना राज्य सरकारवर निशाणा साधला.फडणवीस म्हणाले, अतिशय दुर्दैवी अशाप्रकारची ही घटना आहे. विशेषता आता शेतकऱ्यांचे म्हणणं ऐकून घेण्यासाठी कुठली व्यवस्थाच उरलेली नाही. जिल्हास्तरावर, तालुकास्तरावरही नाही. ज्या प्रकारे अधिकाऱ्यांच्या पोस्टिंग होत आहेत, अनेक ठिकाणी त्या नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांना गरिबाकडे पहायला वेळच नाही. मंत्री, पालकमंत्री, सरकार, मुख्यमंत्री या सर्वांचे शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष आहे. कुठल्याही प्रकारे शेतकऱ्यांना दिलासा देणारा एकही निर्णय हे सरकार घेत नाही. आत्महत्या मोठ्य़ा प्रमाणात वाढत आहेत. अशा या परिस्थितीत मला असे वाटते  की, या घटनेकडे फार गांभीर्याने बघितले पाहिजे. एकतर त्यांच्या जो प्रश्न आहे, किमान त्यांच्या मृत्युनंतर तरी तो प्रश्न सोडवला पाहिजे आणि त्यांच्या कुटुंबियांना मदत केली पाहिजे.तसेच, यावेळी फडणवीसांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली. या तीन पक्षांची युती ही अनैसर्गिक असल्याचं सांगत, त्यांनी तीन पक्षांची तुलना गुळाच्या ढेपेला चिकटलेल्या मुंगळ्यांशी केली.
महाविकास आघाडीचे लोक हे अनैसर्गिक युतीने एकत्र आलेले आहेत. विचारसरणी, विचार, गव्हर्नन्स नाही. केवळ सत्तेला चिकटलेले अशा प्रकारचे हे लोक आहे. ज्याप्रमाणे गुळाच्या ढेपेला मुंगळे चिकटतात, त्याप्रमाणे सत्तेला चिकटलेले हे तीन पक्ष आहे. त्यामुळे सत्तेचा वाटा मिळाला नाही की ते ओरड होते. वाटा मिळाला की सगळे बंडोबा थंडोबा होतात. असे  फडणवीस म्हणाले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा