आष्टी_अतिवृष्टीने पिकांचे अतोनात नुकसान झाले असताना जो शेत माल शेतात तग धरून आहे. त्याला कवडीमोलभाव मिळतोय. शेतकऱ्याने घाम गाळून शेतात पिकवलेल्या उडीदाच्या 25 हजार रुपयांवर चोरट्यांनी डल्ला मारल्याने, तणावात आलेल्या कांतीलाल बाबासाहेब गळगटे या वृद्ध शेतकऱ्याने शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केलीय.ही धक्कादायक घटना बीडच्या आष्टी तालुक्यातील आष्टा हरीनारायण येथे उघडकीस आलीय. दरम्यान याप्रकरणी आष्टी पोलीस पुढील तपास करत असून या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होतेय.
0 टिप्पण्या