(किल्ले धारूर प्रतीनीधी) गेल्या दोन दिवसांपासून बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत असुन शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे.सतत पडणाऱ्या पावसामुळे पिकांचे नुकसान झाले असून गेल्या चार महिन्यांपासून मेहनत करून हातात तोंडासी आलेले शेतकऱ्यांचे पिक वाया गेले आहे शासनाने पंचनामे वगैरे करण्यापेक्षा शेतकऱ्यांना सरसकट मदत करण्यात यावी अशी मागणी बीड जिल्हा प्रहार संघटनेच्या वतीने जिल्हा अध्यक्ष रघुनाथ तोंडे बालाजी घोळवे विठ्ठल मुंडे विष्णू चोले रमेश चव्हाण नंदकुमार झाडे विक्रम मोमीन अशोक सोनवणे संतोष आघाव पदमीन तारडे भास्कर केदार विष्णू मुंडे यांच्यासह बीड जिल्ह्यातील प्रहारचे कार्यकर्ते यांनी शासनाकडे प्रसीधी पत्रकाद्वारे केली आहे.
0 टिप्पण्या