Subscribe Us

header ads

पुरात बळी गेलेल्या कुंटुंबातील व्यक्तीस प्रत्येकी १० लाखाची आर्थिक मदत तात्काळ द्यावी -----पुरुषोत्तम वीर


नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना  हेक्टरी विस हजार द्यावे

 प्रतिनिधी ऋतुजा सोनवणे

बीड / प्रतिनिधी दि.९ बीड जिल्ह्यात झालेल्या सलग‌ २० तासा पेक्षा जास्त काळ अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. जवळपास पूर्णच पिकांची वाताहात लागली आहे. त्याचबरोबर या नैसर्गिक आपत्तीत व पुरात ६ जण वाहुन गेल्याने  मृत्यू आला या पुरात वाहून गेलेल्या कुंटुंतील प्रत्येकी १० लाखाची आर्थिक मदत  असून २९ जनावरे हानी झाली आहे तर २० च्या  वर घरांची पडझड झाली आहे त्यापण भरीव मदत तत्काळ देण्यात यावी अशी मागणे वंचित बहुजन आघाडी चे नेते पुरुषोत्तम वीर यांनी केली आहे.
बीड जिल्ह्यात दि. ४ सप्टेंबर पासून मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आहे या अतिवृष्टीमुळे यंदाचा खरीप हंगाम पूर्णच उद्ध्वस्त झाल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे, तर जिल्ह्यातील मोठ्या धरणाच्या पाण्याची पातळी देखील वाढली असून नदीकाठच्या गावांना मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे या चार दिवसाच्या काळात वडवणी तालुक्यात बंधाऱ्यात वाहून जाऊन ३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर अंगावर भिंत पडून बीडमध्ये एका महिलेचा मृत्यू झाला आहे. तसेच गेवराई तालुक्यात अंगावर भिंत पडून एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. त्याच बरोबर कपिलधार येथे वाहत्या पाण्यात एका मुलाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाले आहे. या बरोबरच पशुधनाची हानीही मोठ्या प्रमाणात झाली आहे. के तालुक्यात पुराच्या पाण्यात तीन बैल वाहून गेले असून धारूर मध्ये एक, आष्टी मध्ये सहा शेळ्या, दोन बैल, दोन वासरू, एक म्हैस पुरात वाहून गेल्याची माहिती असून पाटोदा तालुक्यात एक वगार वाहून गेले आहे. गेवराई तालुक्यात पुराच्या पाण्यात एक गाय तीन बैल वाहून गेले असून जवळपास १२०० कोंबड्या पाण्यात वाहून गेल्या आहेत तर शिरूर कासार तालुक्यात एक शेळी आणि ५० कोंबड्या वाहून गेल्या असून बीड तालुक्यात पाच शेळ्या पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची घटना घडली आहे. अतिवृष्टीमुळे बीड आणि शिरूर कासार तालुक्यात २० ठिकाणी घरांची पडझड झाली असून पावसामुळे झालेल्या अतिवृष्टी भागात सर्व तहसीलदार यांना तातडीने पंचनामे करून अतिवृष्टी भागात सर्व तहसीलदार यांना तातडीने पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. जिवित आणि वित्तहानी बरोबरच शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात झालेले नुकसान येत्या एक-दोन दिवसातच स्पष्ट होणार आहे. पुरत जे दागावले आहेत व शेतीचे नुकसान झाले  आशाना तात्काळ आर्थिक मदत करावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडी चे नेते पुरुषोत्तम वीर यांनी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा