बीड जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील दिव्यांगाची अंत्योदय योजनेत निवड करण्यात यावी अन्यथा प्रहार संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल
(किल्ले धारूर प्रतीनीधी) राज्यातील अंत्योदय अन्न योजणे अंतर्गत लाभार्थ्यांची निवड व अंमलबजावणी बाबत महाराष्ट्र शासना मार्फत शासन निर्णय घेतला असून सुद्धा बीड जिल्ह्यातील दिव्यांग अंत्योदय योजनेपासून वंचित असलेल्याची माहिती प्रहार संघटनेचे बीड जिल्हा अध्यक्ष रघुनाथ तोंडे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद केली पत्रकात पुढे म्हटले आहे की सध्या चालू असलेल्या कोरोणा महामारी च्या संकटामुळे देशासह महाराष्ट्रातील दिव्यांगावर उपासमारीची वेळ आलेली असुन दिव्यांग बांधव पुरता नागडा झालेला दिव्यांगाचे छोटे मोठे व्यावस कोरोणा काळात बंद राहिल्या मुळे दिव्यांगाची आर्थिक घडी विस्कटून दिव्यांगांवर उपासमारीची वेळ आलेली आहे करीता शासन निर्णय प्रमाने दिव्यागांची अंत्योदय योजनेत निवड करुण दिव्यांगांना पिवळ्या शिधा पत्रिका वाटप करण्यात याव्यात असी बीड जिल्हा प्रहार संघटनेच्या वतीने करण्यात आली अंत्योदय योजनेत सहभागी न केल्यास बीड जिल्हा प्रहार संघटनेच्या वतीने मोठा लाढा निर्माण करुन आंदोलन छेडले असी माहिती प्रहारचे जिल्हा अध्यक्ष रघुनाथ तोंडे बालाजी घोळवे विठ्ठल मुंडे भगवान तट ज्ञानदिप शिनगारे महादेव कांगणे नंदकुमार झाडे अशोक सोनवणे रमेश चव्हाण संतोष आघाव पदमीन तारडे भास्कर केदार विष्णू मुंडे विष्णू चोले मुरली जानकर यांच्यासह बीड जिल्ह्यातील प्रहार सैनिकांनी केले आहे.
0 टिप्पण्या