प्रतिनिधी नवनाथ गोरे मो.9823310880
वाकनाथपुर प्रतिनिधी/ वाकनाथपुर येथील टुक्कडमोडी नदीवरील पूल नसल्याने गावकऱ्यांचे खुप हाल होत आहेत.गावातली नागरीकांना बाहेर निघण्यासाठी खुप दुरुन जावं लागत आहे.दळण वळणाचे सर्व साधने बंद पडले आहेत.मोठ मोठे नेते येऊन फक्त आश्वासन देऊन जातात. कोणीही पुल बांधून देण्याचे काम करत नाहीत नदिवर पुल नसल्याने महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांचे ही खुप हाल होत आहेत. दोन दिवसापासून या गावात लाईट नसल्याने या गावाचे लाईनमेन गोकुळ गायकवाड साहेब. आणि त्यांचे सहकारी गोविंद आबुज हे दोन दिवसापासून नदी पलीकडे गाडी उभीकरुण नदीच्या पाण्यातुन जाऊन लाईट फॉल्ट काडून गावकऱ्यांचा विद्युत पुरवठा सुरळीत करत आहेत. त्या बद्दल त्यांच्या कार्याचे कौतुक या गावाचे लोक करीत आहे.
0 टिप्पण्या