बीड :- जिल्ह्यात मागच्या तीन चार दिवसांपासून अतिवृष्टी पाऊस झाला आणि या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झाले खरीप हंगामातील सर्व पिके उध्वस्त झाले आहे आणि शेतातील माती देखील वाहून गेली त्यामुळे शेतकऱ्यांचे दुहेरी नुकसान झाले झालेल्या नुकसान चे पंचनामे न करता सरसकट तात्काळ मदत करा अशी मागणी शिवसेना किसानसेने चे जिल्हाप्रमुख परमेश्वर सातपुते सर यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन मागणी केले आहे त्याच बरोबर सध्या जिल्ह्यात पूर परिस्थिती आहे काही गावाचा संपर्क तुटला आहे त्यामुळे त्यासंदर्भात ठोस पावले उचलून उपाय योजना करण्याची मागणी देखील सातपुते यांनी केली आहे.
यावेळी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले यावेळी माझ्यासोबत उपस्थित जिल्हा समन्वयक बप्पासाहेब घुगे, उपजिल्हाप्रमुख गणेश भाऊ वरेकर, युवा सेना जिल्हाप्रमुख सागर भैय्या बहीर आदी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते..
0 टिप्पण्या