प्रतिनिधि नवनाथ गोरे
♦♦♦♦♦♦
वाकनाथपुर प्रतिनिधी_बीड जिल्हात अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांचे सर्व पिके वाहून गेले आहेत सर्व होत्याच नव्हतं झालं आहे. शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास पाऊसामुळे वाहुन गेले आहे.अनेक तलाव फुटले आहेत अनेक पुले वाहुन गेले आहेत.असाच एक ब्रहमपूर ते भाटसांगवी यांच्या मधल्या ओढ्या वरचा अर्ध्या पुल वाहून गेला आहे पुल वाहुन गेल्याने मोठा खड्डा पडला आहे त्या खड्यात रात्री अपरात्री अचानक एखाद वाहन जाऊन मोठा अपघात होऊ शकतो तरी अर्धा पडलेल्या पुलाचे काम प्रशासनाने लवकरात लवकर करुन होणारा अपघात टाळावा अशी भाटसांगवी .ब्रहमपूर वाकनाथपुर येथील ग्रामस्थांनी मागणी आहे.
0 टिप्पण्या