Subscribe Us

header ads

देवपिंप्री येथे तरूणीचा विहिरीत पाय घसरून दुदैवी मृत्यू

गेवराई  प्रतिनिधी_ गेवराई तालुक्यातील देवपिंप्री येथे तरुणीचा पाणी काढताना पाय घसरून विहिरीत पडल्याने मृत्यू झाला आहे. गुरूवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. सुरेखा गोविंद लबासे (वय १५) असे या तरुणीचे नाव आहे.घटनेबाबत सविस्तर माहिती अशी की, सुरेखा लबासे ही त्याच्या आत्याच्या घरी आल्याली होती. देवपिंप्री शिवारातील शेतवस्तीवर आत्याच्या कुटुंबात राहत होती, शेजारीच असलेल्या शेतातील विहिरीवर पाणी आणण्यासाठी गेली होती, ती बकेटच्या साह्याने पाणी काढत होती, यावर्षी पाण्याचा कहर जास्त असल्याने विहीर, नदी नाले तुडुंब भरलेले आहेत याच दरम्यान तिचा पाय घसरून विहिरीत पडली जवळ असलेल्या आत्याने आरडाओरडा केला परंतु जवळ कुणीही नसल्याने तीला वाचवू शकले नाही. आरडाओरडा झाल्यानंतर जवळील व गावातील ग्रामस्थांनी धाव घेतला परंतु तोपर्यंत तीने विहिरीचे बुड गाठले होते. नातेवाईकांनी गळच्या साह्याने तीचा शोध सुरू केला परंतु विहीर खूप खोल असल्याने, आणि संपूर्ण पाणी असल्याने शोध घेण्यास वेळ लागला तब्बल तीचा मृतदेह ३ तासानंतर तिचा शोध लागला. दरम्यान या घटनेची माहिती पोलीसांना मिळताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली, पंचनामा करून शवविच्छेदनासाठी गेवराई उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा