Subscribe Us

header ads

सासरच्या जाचास कंटाळून विवाहितेने गळफास घेऊन केली आत्महत्या


गेवराई_एका २६ वर्षीय विवाहितेने सासरच्या जाचास कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गेवराई तालुक्यातील आमला वाहेगाव येथे घडली आहे. मनीषा सुधाकर (वय २६ वर्ष) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे.मनिषा सुधाकर या विवाहितेने आज राहत्या घरी आत्महत्या केली. माहिती मिळताच तलवाडा पोलिस घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. दरम्यान हुंड्यात राहिलेले पैसे न दिल्याच्या कारणावरून मयत विवाहितेला सासरची मंडळी सतत शारीरिक व मानसिक छळ करून मारहाण करत होते. या जाचाला कंटाळूनच मनिषाने आत्महत्या केल्याचा आरोप मयत विवाहितेच्या नातेवाईकांनी केला आहे. याप्रकरणी भिमा बन्सी मांजरे रा. कवडगाव ता.वडवणी यांच्या फिर्यादीवरून तलवाडा पोलीस ठाणे येथे गु.र.न.कलम ४९८,(अ).३०६.३०४.(ब),३२३,३४ भादवी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन आरोपींना तलवाडा पोलिसानी अटक केली असून आज त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे, अशी माहिती पो.हे. शांम तोडे यांनी दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा