Subscribe Us

header ads

T20 WC IND vs NZ :दुबईच्या मैदानावर न्यूझीलंडने भारताला ८ गड्यांनी मात दिली.

बीड स्पीड न्यूज 

टी-२० विश्वचषक २०२१ स्पर्धेत टीम इंडियाने निराशाजनक कामगिरी सुरूच ठेवली आहे. दुबईच्या मैदानावर आज भारताला ८ गडी राखून न्यूझीलंडकडून लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले. उपांत्य फेरीच्या शर्यतीसाठी अतिमहत्त्वाच्या असलेल्या या सामन्यात न्यूझीलंडचा कप्तान केन विल्यमसनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट आणि फिरकीपटू ईश सोधी यांनी केलेल्या शिस्तबद्ध माऱ्यासमोर टीम इंडियाच्या फलंदाजांनी सपशेल शरणागती पत्करली. न्यूझीलंडने भारताला २० षटकात ७ बाद ११० धावांवर रोखले. प्रत्युत्तरात सलामीवी डॅरिल मिशेल आणि केन विल्यमसन यांनी दमदार भागीदारी रच न्यूझीलंडच्या विजयावर सहज शिक्कामोर्तब केले. सोधीला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. टी-२० विश्वचषकात न्यूझीलंडने भारताला पराभूत करण्याची परंपरा कायम राखली. या पराभवामुळे भारताची उपांत्य फेरी गाठण्याची आशा धुसर झाली आहे.

न्यूझीलंडचा डाव

भारताच्या छोटेखानी धावसंख्येचा पाठलाग करताना न्यूझीलंडचे सलामीवीर मार्टिन गप्टील आणि डॅरिल मिशेल यांनी आक्रमक सुरुवात केली. झटपट २० धावा बनवल्यानंतर गप्टिलने वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. पण तो अपयशी ठरला. गप्टिल तंबूत परतल्यानंतर मिशेलने मोर्चा सांभाळला. कप्तान केन विल्यमसनने मिशेलला त्याचा नैसर्गिक खेळ खेळू दिला. या दोघांनी एकेरी, दुहेरी आणि मोक्याच्या क्षणी चौकार-षटकार ठोकत भारतावर दबाव वाढवला. न्यूझीलंड विजयाकडे सहज वाटचाल करत असताना मिशेल बाद झाला. त्याने ४ चौकार आणि ३ षटकारांसह ४९ धावा केल्या. त्यानंतर विल्यमसनने डेव्हॉन कॉन्वेला सोबत घेत १५व्या षटकात न्यूझीलंडच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. विल्यमसन ३३ धावांवर नाबाद राहिला.

भारताचा डाव

नियमित सलामीवीरांपेक्षा वेगळा प्रयत्न म्हणून टीम इंडियाने इशान किशन आणि केएल राहुल ही जोडी आजमावून पाहिली. पण न्यूझीलंडने त्यांचा प्रयोग अयशस्वी ठरवला. वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टने इशानला (४) तर पॉवरप्लेच्या शेवटच्या षटकात टीम साउदीने राहुलला झेलबाद केले. राहुलने ३ चौकारांसह १८ धावा केल्या. पॉवरप्लेमध्ये भारताला २ बाद ३५ धावा करता आल्या. तिसऱ्या क्रमांकावर आलेला रोहित शर्मा आणि कप्तान विराट कोहलीकडून आधाराची अपेक्षा होती, पण फिरकीरपटू ईश सोधीने दोघांना जाळ्यात अडकले. त्यानंतर ऋषभ पंतही (१२) माघारी परतला. संथ खेळणारा हार्दिकही १९व्या षटकात माघारी परतला. शेवटच्या षटकात रवींद्र जडेजाने ११ धावा कुटल्यामुळे भारताा शंभरीपार पोहोचता आले. डावाच्या शेवटच्या षटकात भारताने शतक पूर्ण केले. या षटकात भारताने ११ धावा काढल्या. २० षटकात भारताने ७ बाद ११० धावा केल्या. रवींद्र जडेजाने २ चौकार आणि एका षटकारासह नाबाद २६ धावा केल्या. न्यूझीलंडकडून बोल्टने २० धावांत ३ तर सोधीने १७ धावांत २ बळी घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा