बीड स्पीड न्यूज
माजलगाव प्रतिनिधी_शहरातील महेबुब नगर व रहेमत नगर मधिल पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकत करवी लगत आहे. तसेच अनेक वेळा नगर परिषद ला निवेदने देऊनही कसल्याच प्रकारची दखल घेतली जात नाही. नगरपरिषद प्रशासनाकडून लेखी स्वरुपात दिले जाते की, सर्वसाधारण सभेत हा विषय मांडून तात्काळ काम करण्यात येईल अशा आशयाचे अश्वासन दिले जाते. तसेच रस्त्या नाल्या नसल्यामुळे लोकांना घाणीच्या
पाण्यातून जावे लागत आहे.या घाणी मूळे लहान मूलांचे आरोग्य धोक्यात येत असून त्यावर पण कसल्याच प्रकारची दखल घेत नसून सन्माननिय जिल्हाधिकारी साहेब आपणासही या गंभिर समस्ये बाबत आपणास निवेदन दिले असून आपण सबंधित मुख्याधिकाऱ्यांना व अध्यक्ष साहेबानां सूचना देवून वरील समस्यामधून महेबूब नगर येथील नागरीकांची सूटका करावी. अशी माजलगाव येथील महेबूब नगर येथील नागरीकांची मागणी जिल्हाधिकारी साहेब यांना केली आहे.
0 टिप्पण्या