बीड स्पीड न्यूज
प्रतिनिधी नवनाथ गोरे
वाकनाथपुर प्रतिनिधी_बीड जिल्ह्यातील आत्महत्यांचे प्रमाण अधिक वाढले आहे एसटी कामगार सोबत शेतकऱ्याचे आत्महत्यांचे प्रमाण खूप वाढले आहे रोज कोठेना कोठे आत्महत्या करत आहेत आज दिनांक ९ नोव्हेंबर मंगळवार रोजी बऱ्हाणपूर ता.जि.बीड येथील शेतकरी मनोहर किसन लांडे (वय ६०) वर्ष या शेतकऱ्याने सकाळी ६ वाजण्याच्या दरम्यान गावाजवळील रघुनाथ लांडे यांचे गट नं ४ अमराई या शेतामध्ये लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. मनोहर किसन लांडे यांच्याकडे काही खाजगी सावकाराचे व
काही बँकेचे कर्ज असल्याचे बोलले जात आहे. हे कर्ज कसे फेडावे या नैराश्यातून या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे. घटनास्थळी पिंपळनेर पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक सोनवणे साहेब यांनी येऊन पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी बीड येथील आरोग्य केंद्रात पाठवला आहे. पुढील तपास पिंपळनेर पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक सोनवणे साहेब हे करत आहेत.त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा असा परिवार आहे.
0 टिप्पण्या