बीड स्पीड न्यूज
प्रतिनिधी नवनाथ गोरे
वाकनाथपूर प्रतिनिधी_बीड तालुक्यातील ग्रामीण भागात रस्त्यावर डांबर देखील राहिले नाही काही रस्त्याने मोटरसायकल ही जीव मुठीत घेऊन चालवावी लागते परंतु लोकप्रतिनिधि आणि बांधकाम विभाग या कडे दुर्लक्ष करत आहेत. आणि काही रस्ते मंजुर झालेले असून देखील दोन दोन वर्षे रस्त्याचे काम केले जात नाही जाणुन बुजुन ग्रामीण भागाचा विकास करत नाहीत असे दिसुन येत आहे. या पैकी वाकनाथपुर फाटा ते म्हाळस जवळा
हा पाच किलो मीटरचा रस्ता दोन वर्षे उलटून गेले तरीही काम पूर्ण झाले नाही खडी आणि मुरून टाकून रस्त्याचे काम बंद केले आहे. काही जाग्यावर हा रस्ता वाहुन देखील गेला आहे. पाच किलो मीटरचा रस्ता पूर्ण करण्यासाठी दोन वर्ष लागतात का?आणि दोन वर्षे उलटून गेले तरीही या रस्त्याचे काम का होत नाही याची चौकशी करून योग्य ती कारवाई करत या रस्त्याचे डांबरकरण करून लवकरात लवकर काम पूर्ण करावे अशी या भागातील नागरिकांची मागणी आहे.
0 टिप्पण्या