Subscribe Us

header ads

शहराला सहा दिवसाआड पाणीपुरवठा - नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर

बीड स्पीड न्यूज 

शहराला सहा दिवसाआड पाणीपुरवठा - नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर

बीड प्रतिनिधी_ शहरासाठी माजलगाव बॅक वॉटर येथून पाणीपुरवठा होतो या बॅक वॉटर मधून अमृत अटल योजनेच्या माध्यमातून नवीन पाईप लाईनद्वारे शहराला सहा दिवसाआड पाणीपुरवठा सुरू असल्याचे नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी सांगितले.माजलगाव बॅक वॉटर येथून अमृत अटलच्या नवीन योजनेची उर्वरीत कामे अंतिम टप्प्यात असून बीड शहर व वाढीव हद्दीत सध्या सहा दिवसाआड पाणीपुरवठा केला जात असून पाईप लाईनच्या काही तांत्रिक अडचणीमुळे एक दोन दिवस पाणी सोडण्यास उशीर होतो. अमृत अटल पाणी पुरवठा योजना ही बीड शहराची २०५१ मधील लोकसंख्या गृहीत धरून आणली आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांना पाण्याची टंचाई भासणार नाही. आता हे पाईप लाईन चे काम अंतिम टप्प्यात आले असल्यामुळे काही तांत्रिक अडचणीमुळे पाणी पुरवठा खंडित होत असतो. मात्र हे काम लवकरच पूर्ण होईल व बीड वासियांना सध्या सहा दिवसाआड सुरू असलेला पाणीपुरवठा काही दिवसांनी तीन दिवसाआड करण्यात येईल असे नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसार यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा