बीड स्पीड न्यूज
नवगण राजुरी (प्रतिनिधी):- प्रतिष्ठेची समजल्या जाणार्या सेवा सहकारी संस्था नवगण राजुरीची सोसायटीच्या निवडणुकीत माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांना धक्का बसला आहे. सोसायटीतील सर्व मतदारांनी गजानन कारखान्याचे चेअरमन रविंद्र दादा क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून सर्व उमेदवारांना दणदणीत विजयी केले आहे. आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांच्या गटाचे सर्व उमेदवार विजयी झाल्यानंतर नवगण
राजुरीमध्ये आज मोठा जल्लोष साजरा करण्यात आला.बीड तालुक्यातील नवगण राजुरीची सेवा सहकारी सोसायटी निवडणुक पार पडली. सोसायटीच्या पंधरा जागांसाठी निवडणुक झाली. यात आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांच्या गटाच्या 13 उमेदवारांचा दणदणीत विजय झाला तर दोन उमेदवार आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांच्या गटाचे बिनविरोध निवडुण आले होते. या निवडणुकीत माजी मंत्री यांना चांगलाच दणका बसला असून गावातील मतदारांनी आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ताब्यात सेवा सोसायटी दिली आहे.
0 टिप्पण्या