रक्तदान करा राष्ट्रीय एकात्मता वाढवा
उपक्रम: बार्टी केंद्रात सीएस डॉ. सुरेश साबळे यांचे प्रतिपादन
बीड/ प्रतींनिधी-:रक्तदान करा आणि राष्ट्रीय एकात्मता वाढवा, कारण रक्तदान हे श्रेष्ठदान आहे. त्याने एखाद्या माणसाचा जीव वाचतो. त्यामुळे समाजातल्या प्रत्येक व्यक्तीने रक्तदान करणे काळाची गरज आहे. असे आव्हानात्मक प्रतिपादन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश साबळे यांनी व्यक्त केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह व समाज सुधारक महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंती निमित्त मंगळवार (ता. 12) रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिराचे उद् घाटन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश साबळे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी उपस्थितांना रक्तदानाचे महत्व पटवून देताना डॉ. सुरेश साबळे बोलत होते.यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी ) मान्यताप्राप्त, सम्राट प्रतिष्ठान उमरद खालसा संचलित छत्रपती राजर्षी शाहू महाराज स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रचे अध्यक्ष राहुल वाघमारे, डॉ. बाळासाहेब जावळे, सुनिल डोंगरे,केंद्र प्रमुख प्रा. यशवंत वावळ्कर, सहाय्यक केंद्र प्रमुख प्रा. अविनाश वडमारे, ग्रंथपाल सचिन काकडे, अंबिका शिंदे, प्रा. अमोल क्षीरसागर, प्रा. शिवाजी रूपनर, सचिन मेरूकर, विनोद जोगदंड, राहुल शिंदे, मुकेश निसर्गंध,दीपालीताई निर्मळ यांनी मोलाचे परिश्रम घेवून रक्तदान शिबिराचा कार्यक्रम यशस्वी केला. दरम्यान या रक्तदान शिबिराच्या कार्यक्रमासाठी जिल्हा रूग्णालयातील डॉ. दीपाली कट्टे, डॉ. राम आव्हाड, रक्त संक्रमण अधिकारी बी. जे. नागरगोजे, अंबादास जाधव, वैभव लोहार आदींची उपस्थिती होती. बार्टी केंद्रात स्पर्धा परीक्षांचे मोफत प्रशिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यानी व स्टाफने असे एकूण 16 रक्तदात्यांनी रक्तदान करून महामानवांना अभिवादन केले.
0 टिप्पण्या