Subscribe Us

header ads

मशीदीवरचे भोंगे काढ़ण्यापेक्षा गाईला राष्ट्रीय पशु घोषित करा, सतीप्रथा, बालविवाह बंद करा व विधवा पुनर्विवाहासाठी पुढाकार घ्या --इलियास इनामदार

बीड स्पीड न्यूज 


मशीदीवरचे भोंगे काढ़ण्यापेक्षा गाईला राष्ट्रीय पशु घोषित करा, सतीप्रथा, बालविवाह बंद करा व विधवा पुनर्विवाहासाठी पुढाकार घ्या --इलियास इनामदार

बीड प्रतिनिधि : राज साहेब मशीदीवरचे भोंगे काढ़ण्यापेक्षा केंद्र सरकारला मागणी करा गाईला राष्ट्रीय पशु घोषित करा म्हणून कारण गाई तुमची पण माता आहे हे विसरु नका गाईच्या कत्तल कारखान्या मधून कोटीचे महसूल व हप्ते कोण गोळा करतो हे जग जाहिर आहे, सतीप्रथा प्राचीन काळापासून भारतात अस्तित्वात आहे आज पण देशातील अनेक राज्यात मानवाला शर्मसार करणाऱ्या सतीप्रतेच्या घटना घड़ताना  आपणास पहावयास मिळतात देशात अनेक ठिकाणी बालविवाह होताना आपण बघतोय ही प्रथा बंद करण्यासाठी प्रयत्न करा  व विधवा पुनर्विवाहासाठी पुढाकार घ्या तर खर तुम्ही प्रबोधनकार ठाकरे यांचे वंशज आहे असे आम्ही समजू नाही तर मग तुम्ही फ़क़्त सुपारी मास्टर आहोत असे समजू असा मार्मिक सल्ला लोकसेना प्रमुख प्रा. इलियास इनामदार यांनी दिलेला आहे देशामध्ये काही वर्षा पासून धार्मिक कट्टरता फोफावताना दिसत आहे एका विचिष्ठ समाजाबद्दल वक्तव्य करायचे आणि प्रसिद्धि घ्याची, ते घेणार ते बोलणार कारण त्यांना माहित आहे देशावर कामचूकार व धर्मद्वेषी नेते  राज्य करत आहे काही बोला काहीही करा दंगली करा जाळपोळ करा सार्वजनिक संपत्तिचे नुकसान करा दुसऱ्याच्या धार्मिक स्थळाची विटाम्बना करा नासधुस करा आपल्यावर कोणीही काही कार्यवाही करणार नाही पण हे किती दिवस चालणार असले धंदे जास्त काळ चालत नसतात मग ते राज ठाकरे असो का नरेन्द मोदी असो का योगी शाह असो धर्माची राजनीती देशाला बुडवते राज ठाकरे तर पोपटपंछी आहे ज्याने मिर्ची चार्ली त्याचे गाने गातात मग ते आघाडी पक्ष असो का युती पक्ष असो फ़क़्त चर्चेत कसे राहता येईल हा राज ठाकरेचा नेहमी प्रमाणे धंदा आहे आज देशात महगाई, बेरोजगारी, किसान समस्या आहे डीज़ल, पेट्रोल व गैस खाद्य पदार्थाचे भाव गगणाला भिड़त आहे  युवकान्ना नौकऱ्या नाही धार्मिक उन्माद माजलेला आहे अल्पसंख्याक व मागास्वर्गीय समाज स्वताला देशामध्ये असुरक्षित समजू लागला आहे यांना त्रास दिल्यामुळे देशातील बहुतांश कट्टर लोक खुश पण होतील भाजपा व हिंदुत्ववादी संघटना अल्पसंख्याक व मागास्वर्गीयांना टार्गेट करुन  मित्रांनो याच्या आड़मध्ये भाजपा सरकार देशाला खाजगीकरणाच्या रूपाने रेल्वे, बैंका, विमानतळे, देशातील मोठमोठाल्या सार्वजनिक जमीनी अदानी-अंबानी-रामदेव बाबा सारख्या काही लिमिटेड उद्योगपती लोकांना विकण्याचा प्रयत्न आवश्य करत आहे. सोबत इलेक्ट्रॉनिक मीडिया आहेच लोकांचे लक्ष सरकारकडून दुसरीकडे विचलित करायला हल्ली भाजपा खासदार सोमय्याने किती येडयात काढल देशातील जनतेला सैन्याचे जहाज विक्रांतच्या दुरुस्तीसाठी लोकांकडून कोटयावधीची वर्गणी गोळा करण्यात आली आणि गोळा केलेला पैसा सोमय्या महाशयान्नी सैन्य कार्यालय किंवा शासनाला न देता सरळ भाजपा कार्यालयामध्ये जमा केला आहे सरळ सरळ देशाची लूट धार्मिक उन्मादाच्या आड़मध्ये सुरु आहे भाजपा व हिंदू संघटनान्ना मंदिर-मस्जिद, हिंदू-मुस्लिम, गाय, पाकिस्तान, भोंगे, हिजाब, सायरन दिसतो पण त्यांना दिसणार नाही evm मशीनचा घोळ, प्रशासनामध्ये आपले मर्जीतील अधिकारी, केंद्रीय तपास यंत्रणाला आपल्या इशाऱ्यावर चलावणे, न्यायलय आस्थेवर किंवा सरकारच्या दबावामध्ये निर्णय देताना दिसत आहे.  जर देशाच्या जनतेचे तुम्ही संरक्षण करू शकत नाही त्यांना न्याय मिळवून देवू शकत नाही तर आपण मार्गदर्शन करावे की देशातील अल्पसंख्याक व मागास्वर्गीय जनतेने न्याय व संरक्षणासाठी कोणते पाऊल उचलावे म्हणून कारण एका विशिष्ट समाजाला धर्माच्या आड़मध्ये राजकीय फायदयासाठी त्रास देणे हे संविधान, धर्मनिरपेक्षता व  लोकशाहीला काळीमा फासल्यासारखे आहे देशाने मुस्लिम समाजाच्या बलिदानाची आठवण ठेवावी काही जातीयवादी नेत्यांच्या नादी लागुन देशाचा नुकसान करू नये शांतता व बंधुभाव कायम ठेवावा देश यामुळे प्रगती करेल विकसित व महासत्ता होण्यास मदत होईल असे आव्हान जनतेला  लोकसेना प्रमुख प्रा. इलियास इनामदार यांनी प्रसार माध्यमांच्या वतीने केले आहे.

                                 
                  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा