Subscribe Us

header ads

जिल्हा वार्षिक योजनेतील राखीव निधी वगळून इतर योजनातील विकास कामांचे प्रस्ताव तातडीने सादर करावेत - पालकमंत्री धनंजय मुंडे

बीड स्पीड न्यूज 


जिल्हा वार्षिक योजनेतील राखीव निधी वगळून इतर योजनातील विकास कामांचे प्रस्ताव तातडीने सादर करावेत - पालकमंत्री धनंजय मुंडे

शिक्षण, महिला व बाल विकास, गृह आणि  कोवीड दायित्व आदी विकास कामांसाठी 55 कोटी राखीव

महावितरण मार्फत जिल्ह्यामध्ये जिल्हा वार्षिक योजना मधून 36 कोटी 70 लक्ष रुपयांची कामे

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून 278 रस्त्यांची कामांचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी नियोजन करावे

पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली बीड जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न

बीड|प्रतिनिधी-:  दि. 28::--जिल्हा वार्षिक योजना मधून बीड जिल्ह्याच्या विकासासाठी सन 2022 -23 च्या 370 कोटी रुपयांच्या आराखड्यास राज्य शासनाने यापूर्वी मंजुरी दिली आहे. मंजूर निधीपैकी 55 कोटी रुपये निधी राखून ठेवण्यात येत असून उर्वरित निधी बाबत प्रस्ताव शासकीय विभागांनी तातडीने सादर करावेत. काही विभागांसाठी निधी राखून ठेवण्याच्या शासनाच्या निर्देशामुळे आणि विविध योजनातील 21% दायित्वासाठी पुनर्नियोजन करण्यात येत असून याप्रसंगी इतर योजनातील कामांसाठी पंधरा टक्के कपात करून प्राप्त निधीनिहाय प्रशासकीय मान्यता देण्यात येतील, असे राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड 

जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले.जिल्हाधिकारी कार्यालयात आज पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. पालकमंत्री श्री.मुंडे यांनी ऑनलाइन द्वारे बैठकीस मार्गदर्शन केले. बैठकीला आमदार प्रकाश सोळंके, आमदार संदीप क्षीरसागर यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून आणि आमदार बाळासाहेब आजबे व आमदार संजय 

दौंड आॅनलाइन उपस्थित राहून सहभाग घेतला.  सभागृहात जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा , जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर , जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके, जिल्हा नियोजन अधिकारी रामकृष्ण इगारे तसेच जिल्हा 
नियोजन समितीचे सदस्य बाबुराव पोटभरे, वाल्मिक कराड,  सचिन मुळुक, अनिल जगताप आदींची प्रमुख उपस्थिती होती. राज्य शासनाने  शिक्षण विभाग , गृह विभाग, महिला व बाल कल्याण आणि कोविडच्या 

अनुषंगाने निधीबाबत पंधरा टक्के निधी राखून ठेवण्याबाबत सूचना दिल्या आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हा नियोजन समितीमध्ये आमदार प्रकाश दादा सोळंके यांनी यातील पुन:नियोजनाचे अधिकार पालकमंत्री यांना देण्याबाबत मांडलेल्या ठरावास उपस्थित सदस्यांनी मान्यता दिली. सदर अधिकार पालकमंत्री धनंजय मुंडे यांना देण्यासाठी जिल्हा नियोजन समितीतील ठराव मंजूर करण्यात आला.

मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतील रस्त्यांची कामे लोकप्रतिनिधींच्या मागण्या विचारात घेऊन निश्चित करावी-पालकमंत्री धनंजय मुंडे

मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतील रस्त्यांची प्राधान्यकृत आली लोकप्रतिनिधींच्या मागण्या विचारात घेऊन अंतिम केली जावी असे निर्देश पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी दिले. जिल्ह्यातील विविध गावांमध्ये ग्रामसडक योजनेतून रस्त्यांची कामे सुरू आहेत. यंदा 278 कामांना कामांचे उद्दिष्ट देण्यात आले असून यासाठी तालुकानिहाय तयार केलेल्या प्रस्तावित कामांची यादी यंत्रणेकडून आज सादर करण्यात आले. यावेळी अनेक वर्षांपासून मंजुरी देण्यात येऊन देखील मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून कामे पूर्ण केले नाहीत अशा ठेकेदारांवर काळ्या यादीत टाकण्याची कारवाई करताना न झालेली कामे रद्द करण्यात यावी, अशा सूचना पालकमंत्री श्री मुंडे यांनी दिले.

वीजवितरण व्यवस्था सुधारण्यासाठी महावितरण मार्फत जिल्ह्यामध्ये जिल्हा वार्षिक योजना मधून 36 कोटी 70 लक्ष रुपयांची कामे -- पालक मंत्री धनंजय मुंडे

महावितरण कडून जिल्ह्यासाठी जिल्हा वार्षिक योजना मधून 36 कोटी 70 लक्ष रुपयांचा आराखडा सादर करण्यात आला. यामध्ये नवीन उपकेंद्र तसेच 33 केव्ही उच्च दाब वाहिन्या, 11 केवी उच्चदाब वाहिनी,  क्षमतावाढ यासह विविध कामे प्रस्तावित करण्यात आले आहेत. प्राप्त निधी व मंजुरी निहाय कामे तातडीने सुरू करण्यात यावी असे निर्देश पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी दिले.जिल्ह्यात नवीन 7 उपकेंद्र प्रस्तावित करण्यात आली असून माजलगाव धारूर परळी बीड अंबाजोगाई आदी ठिकाणी आर डी एस एस मधून कामे केली जाणार आहेत . यामध्ये तीर्थक्षेत्र पुरुषोत्तम पुरी येथे नवीन उपकेंद्र होणार आहे कुप्पा व देवडी दरम्यान 14 किलोमीटर लिंक लाईन तसेच जिल्ह्यातील विविध भागात 91 किलोमीटर लांब 11 केवी उच्चदाब वाहिनी आणि 21 किलोमीटर लांब 33 केव्ही उच्चदाब वाहिनी याची कामे प्रस्तावित करण्यात आले आहेत अशी माहिती यावेळी देण्यात आली.आमदार प्रकाश सोळंके यांनी महावितरण मार्फत नियोजन करताना सर्व तालुके मध्ये समान कामे प्रस्तावित करावीत अशी सूचना केली आमदार संदीप क्षीरसागर यांनी पाली येथे उपकेंद्र होणे गरजेचे असून बीड तालुक्यातील मंजूर झालेल्या अंजनवती येथील नवीन उपकेंद्राचे काम वेळेत व्हावे अशा अशी सूचना केली.आमदार बाळासाहेब आजबे यांनी कृषी पंपांना वाढीव वीज पुरवठा होण्यासाठी महावितरण मार्फत क्षमतावाढीची कामे अशी सूचना केली.जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी यंत्रणांनी मंजूर कामे वेळेत पूर्ण होण्याच्या दृष्टीने तांत्रिक दृष्ट्या परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्याकडे लक्ष द्यावे असे सांगितलेयाप्रसंगी जिल्हा नियोजन अधिकारी रामकृष्ण इगारे,महावितरणचे मुख्य अभियंता श्री. लटपटे, अधीक्षक अभियंता योगेश निकम, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे कार्यकारी अभियंता अनिल सगर आदींनी बैठकीमध्ये नियोजन व झालेल्या कामं बाबत माहिती सादर केली.जिल्हा वार्षिक योजनेतील निधी राखून ठेवताना राज्य शासनाच्या निर्देशानुसार शिक्षणासाठी पाच टक्के म्हणजे 19 कोटी 50लाख रुपये, महिला व बालविकास विभागासाठी तीन टक्के म्हणजेच 10 कोटी 80 लाख, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेसाठी 39 कोटी 70 लाख, गृह विभागासाठी तीन टक्के म्हणजे 10 कोटी 80 लाख आणि कोविडदायित्व म्हणून 5 कोटी रुपये राखून ठेवण्यात येत आहे. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा