बीड स्पीड न्यूज
शेतीच्या वादातून एकाचा खून; पत्नी व मुलगा गंभीर जखमी
परळी | प्रतिनिधी-: परळी तालुक्यातील धारावती तांडा येथे शेतीच्या वादातून दोन गटात झालेल्या जोरदार हाणामारी एकाचा मृत्यू झाला असून मयताची पत्नी व मुलगा गंभीर जखमी झाले. याप्रकरणी पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. याबाबत अधिक माहिती अशी की परळी पासून जवळच असलेल्या धारावती तांडा येथे शेतीच्या वादातून दोन गटात तुफान हाणामारी झाली. या हाणामारीत शेख इलियास (रा.इस्लामपुरा. बंगला) या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला असून मयताची पत्नी व मुलगा गंभीर जखमी झाले आहे. त्यांना पुढील उपचारासाठी अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान या घटनेनंतर ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मारुती मुंडे घटनास्थळी दाखल झाले आहे. परळी शहरात कोणत्याही प्रकारचा तणाव वाढू नये यासाठी पोलिसांनी दवाखाना परिसर तसेच शहरात तगडा बंदोबस्त तैनात केला आहे. दरम्यान याप्रकरणी पोलिसांनी चार संशयितांना ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
0 टिप्पण्या