पाटोदा तालुक्यातील चुंबळी गावी एका अल्पवयीन मुलीला गावातील एक हरामखोर आरोपी सतत त्रास देत होता मुलीचे आई वडील घरी नसताना मुलीला एकटी पाहून तिच्यावर अत्याचार करुन तिचा खून केला ही घटना म्हणजे माणूसकीला काळीमा फासनारी होय अशा आरोपीला फासावर लटकावले पाहिजे. सुर्डी व सिरसाळा प्रकरण ताजा असताना चुंबळी घटना घड़ने म्हणजे बीड जिल्ह्यात कायदयाचा धाक राहिला नाही.
जिल्हा प्रशासनाच्या ढीसाड कारोबाराने बीडचा बिहार करुन टाकला जिल्ह्यात एका महिन्यात अनेक अत्याचार झाल्याचे निदर्शनास आल्याचे आपल्याला पहावयास मिळाले जिल्ह्यात वाळू तस्करी, मटक्याचे धंदे, पत्तेचे कलब, सर्रास दारू विक्री, सावकाराचा धुमाकुळ गुंडागर्दी अशा गुन्हेगारीने डोके वर काढलेले आहे याला आळा घालण्याची जबाबदारी जिल्हा कलेक्टर व पोलिस अधीक्षक यांची असते पण दोघेही अपयशी ठरले आहे. वेळीच जिल्हा प्रशासनाने गंभीरता दाखवली तर अशा घटना प्रशासन टाळू शकतो व गुन्हेगारीवर आळा बसेल व स्वत: पोलिस अधीक्षकान्नी चुम्बळी प्रकरण हाताळून आरोपीवर खुनाचा गुन्हा दाखल करावा व आरोपीला जन्मठेप किंवा फाशी होण्याकरीता प्रयत्न करावे अशी मागणी लोकसेना संघटनेने केली आहे.
0 टिप्पण्या