धडक कारवाईत हायवा स्कार्पिओ जप्त
अधून-मधून कारवाया होत असल्या तरी कारवायांबद्दलही शंकाच असते. ‘हप्तोखोरीमुळेच वाळू उपसा व वाहतूक’ अशा पोलिस बारमाही सोशल मिडीयावर पडतात. दरम्यान, याच सर्व मुद्द्यांमुळे नव्याने रुजू झालेले जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी या विषयात लक्ष घातले.या तक्रारींची खातरजमा करण्यासाठी त्यांनी बुधवारी रात्री १२ वाजता पोलिस अधीक्षक राजा रामास्वामी यांना घेऊन गेवराई तालुक्यातील राक्षसभुवन गाठले. वाळू वाहतूक व उपसा करणाऱ्यांना संशय येऊ नये म्हणून त्यांनी वाहनही साधे अंबर दिवा नसलेले वापरले.त्यांच्यासह पोलिस अधीक्षकांचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विलास हजारे यांचेही पथक होते. काही वेळानंतर गेवराईचे तहसिलदार श्री. खाडे देखील अधिकाऱ्यांसह पोचले. दरम्यान, या कारवाईत अवैध वाळू वाहतूक करणारे सात हायवा व एक जीप ताब्यात घेण्यात आली आहे. आता या कारवाईने काही फरक पडणार आहे की पहिले पाढे पंचावन्न हे पहावे लागेल.
0 टिप्पण्या