Subscribe Us

header ads

सिरसदेवी येथे भिंत पडून 65 वर्षीय महिलाचा मृत्यू

गेवराई-:गेवराई तालुक्यातील सिरसदेवी येथे रात्री झालेल्या अवकाळी पावसामुळे जीर्ण भिंत पडल्याने घरात झोपलेल्या राधाबाई मिसाळ (वय 65) यांच्या अंगावर भिंत पडून दगडाखाली दबल्याने मृत्यू झाल्याची घटना सिरसदेवी येथे घडली आहे.सविस्तर असे की या घटनेची माहिती गावचे सरपंच रवींद्र बप्पा गाडे, ग्रामसेवक देवकर, मंडळाधिकारी खेडकर, तलाठी व बीट आमलदार श्याम तोडे साहेब यांना मिळाली असता यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.राधाबाई मिसाळ यांच्या पश्चात कोणी नसल्यामुळे त्या घरात स्वतः  राहत होत्या त्यांचा मृत्यू रात्री अवकाळी पाऊस सुरू असताना १२ ते ०१ च्या दरम्यान झोपेत असताना अंगावर   भिंत कोसळून मृत्यू झाला.घटनास्थळी तलवाडा पोलीस दाखल झाले व पंचनामा करून मृतदेह पीएम साठी जातेगाव प्राथमिक आरोग्य केंद्र येथे पाठवण्यात आले असून राधाबाई यांचे दूरचे नातेवाईक यांच्या वतीने अंत्यविधी करण्यात येणार आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा