Subscribe Us

header ads

देवदर्शन करून दुचाकीवरून परतणाऱ्या कुटुंबाला भरधाव वाहनाची धडक, पत्नीचा जागीच मृत्यु

गेवराई प्रतिनिधी_जालना जिल्ह्यातील अंबड येथून देवदर्शन करुन गावाकडे परत जात असताना शहापुर गावाजवळ अज्ञात वाहनांनी दुचाकीला धडक देवून 25 वर्षीय महिला जागीच ठार झाले तर बापलेक या अपघातात जखमी झाले आहेत.हा अपघात 18 सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास घडला.गेवराई तालुक्यातील किनगाव येथील पांडुरंग मधुकर चाळक (31) व पत्नी स्वाती पांडुरंग चाळक (25) हे त्यांच्या मुलाला घेऊन अंबड येथे देवदर्शनाला गेले होते. पती-पत्नीसोबत मुलगा ही होता. देवदर्शन करून त्यांच्या स्प्लेंडर बाईकवरून ते किनगाव गावी परत जात असताना जालना- वडीगोद्री राष्ट्रीय महामार्गावरील शहापूरजवळ येताच अज्ञात वाहनाने त्यांना जोरात धडक दिली. यात स्वाती चाळक यांना जबर मार लागल्याने त्या जागीच मुत्युमुखी पडल्या तर पांडुरंग व त्यांच्या मुलगा दोघेही गंभीरीत्या जखमी झाले आहेत. त्यांना अंबड येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा