बीड_ परभणी जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यातील डिघोळ तांड्यातील महाविद्यालयीन तरुणीवर आठ दिवसापूर्वी सामुहिक बलात्कार झाला होता,बदनामीच्या भितीने त्या भगिनीने विष प्राशन केले होते परंतु अखेर तिची काल 20 सप्टेंबर रोजी झुंज संपली, बंजारा समाजाच्या भगिनीवर सामुहिक बलात्कार करणार्या त्या तिनही नराधमाला तात्काळ अटक करुन फासावर चढवा अन्यथा राज्यभर तिव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा सेवालाल सेना संस्थापक अध्यक्ष बी एम पवार यांनी दिला आहे. या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री आणि ग्रहमंत्रयांना दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, परभणी जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यातील डिघोळ तांड्यातील महाविद्यालयीन भगिनीवर 12/9/2021 रोजी तीन नराधमाने सामुहिक बलात्कार केला होता, बलात्कार झाल्याने समाजात आपली बदनामी होईल या भीतीने त्या भगिनीने विषारी औषध प्राशन केले होते. त्या भगिनीवर लातुर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असतानाच काल रात्री तिची मृत्यूशी झुंज अखेर संपली. एका महाविद्यालयीन तरुणीवर सामूहिक बलात्कार झाल्याने महाराष्ट्र सुन्न झाला होता. बंजारा समाजाच्या भगिनीवर सामुहिक बलात्कार झालेला असताना सुद्धा या घटनेतील आरोपीला आरोपींना पोलिसांनी अद्याप अटक केलेली नाही हि खूपच संतापजनक आणि लाजिरवाणी बाब आहे. सोनपेठ तालुक्यातील डिघोळ तांड्यातील महाविद्यालयीन बंजारा भगिनीवर सामुहिक बलात्कार करणार्या त्या तिनही नराधमाला पोलिसांनी तात्काळ अटक करावी आणि राज्य सरकारने हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा आणि या नराधमांना फासावर चढवावे, सदरील घटनेमुळे राज्यातील बंजारा समाजाच्या भडकल्या असून शासनाने तात्काळ पावले उचलली नाहीत तर बंजारा समाजात उद्रेक होईल याची भान ठेवावी. लोकशाहीला आणि माणुसकिला काळीमा फासणारी ही घटना असुन पोलीसांनी या संदर्भात तात्काळ कार्यवाही केली नाही तर बंजारा समाज बांधव राज्यभर उतरून तिव्र आंदोलन करेल असा इशारा सेवालाल सेना अध्यक्ष बी एम पवार यांनी दिला आहे.
0 टिप्पण्या