Subscribe Us

header ads

खून प्रकरणात तीन सख्ख्या भावना जन्मठेपेची शिक्षा!

बोरखळ (ता.सातारा) येथे भरदिवसा तीन सख्ख्या भावांनी शेतामध्ये झालेल्या वादावादीतून चाकू, लोखंडी पाईप, लाकडी दांडके याने एकाला मारहाण करत, खून केल्याप्रकरणी अतिरिक्त सत्र न्यायाधिश एन. एल. मोरे यांनी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.रुपेश रसाळ, हेमंत रसाळ, सूरज रसाळ (तिघे रा.बोरखळ ता सातारा ) अशी आरोपींची नावे आहेत. राजेश नामदेव पाटील (वय ४०, रा.बोरखळ) असे खून झालेल्याचे नाव असून याप्रकरणी मच्छिंद्र नारायण पाटील (वय ४८) यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिलेली होती.यातील तक्रारदार मच्छिंद्र पाटील हे दि. २८ जून २०१६ रोजी दुपारी बोरखळ मधील कोळकीचा माथा येथे शेळ्या चारत होते. त्यावेळी शेळ्या संजय रसाळ यांच्या मालकीच्या भुईमुगाच्या शेतात गेल्या. शेतात शेळ्या गेल्याच्या कारणातून पाटील व रसाळ यांच्यामध्ये वाद झाला व त्यातून रसाळ यांनी पाटील यांना काठीने मारहाण झाली. या वादानंतर मच्छिंद्र पाटील घरी जात असताना त्यांचा पुतण्या राजेश पाटील यांना भेटला असता मारहाण झाल्याचे त्यांना समजले. यामुळे पाटील कुटुंबीय मारहाणीबाबतचा जाब विचारण्यासाठी रसाळ यांच्याकडे गेले. याचवेळी चौकात संशयितांनी हत्यारासह राजेश पाटील यांच्यावर हल्ला चढवला. या हल्ल्यात राजेश यांच्या पाठीवर, पोटावर वार झाल्याने ते रक्ताच्या थारोळ्यात पडले व जागीच त्यांचा मृत्यू झाला. यामुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले. या घटनेची माहिती तालुका पोलिसांना समजल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. खूनाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपींना अटक करण्यात आली.या घटनेचा सहायक पोलीस निरीक्षक सुनील जाधव यांनी तपास करुन दोषारोपपत्र जिल्हा न्यायालयात दाखल केले. न्यायालयात दोन्ही पक्षाचा युक्तिवाद ऐकून न्यायाधिशांनी तिन्ही भावांना जन्मठेप व प्रत्येकी ५ हजार रुपये दंड. तो दंड न भरल्यास ३ महिने साधा कारावासाची शिक्षा ठोठावली. सरकार पक्षातर्फे अ‍ॅड.मिलिंद ओक यांनी काम पाहिले. प्रॉसिक्युशन स्कॉडचे पोलिस हवालदार शुभांगी भोसले, पूर्णा यादव, घाडगे यांनी सहकार्य केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा