(बीड प्रतिनिधी) कुक्कडगाव, खंडोबा मंदिर शेजारी, अनेक वेळा तक्रार देऊन ही मंडल अधिकारी ,तहसीलदार ,पोलीस प्रशासन,महसूल अधिकारी, कोणतीही कारवाई करत नाहीत.अनेक वेळा मंडल अधिकारी तहसीलदार, तलाटी, हे वाळूच्या साठ्या जवळ जाऊन पाहणी करतात पण कोणतीही कारवाई न करता तडजोड करून हे अधिकारी माघारी जातात?? आज ही शिंदफना नदी पात्रात वाळू उपसा केलेले साठे दिसत आहे. आणि महसूल विभाग, तहसीलदार, मंडळ अधिकारी, यांना हे साठे कोणाचे आहेत हे माहीत आहे परंतु अद्यापही कुठलीही कारवाई का होत नाही,? मंडळ अधिकारी
पोलीस प्रशासनाची या वाळू उपसा करण्यावर खुप कृपा आहे असेच चित्र दिसत आहे. सर्व महसूल अधिकारी तहसीलदार, मंडळ अधिकारी, आणि पोलीस प्रशासन, हे फक्त बघायची भूमिका घेत आहे. मग या वाळू माफियांच्या विरोधात कारवाई कोण करणार आहे.?? मंडल अधिकारी. तहसीलदार महसूल विभाग. पोलीस प्रशासन हे वाळू माफियांचा पाठराखण करण्यासाठीं आहे का.? या सर्व अधिकाऱ्यांचा हलगर्जी पणाने वाळू माफिया विना रॉयल्टी पावतीची बिनधास्तपणे वाळू उपसा करीत आहे.जर अवैध धंद्यांना साथ दिली जात असेल तर कायदा सुव्यवस्थेला मुठ माती द्यायला वेळ लागणार नाही! येनकेन प्रकारे या वाळू माफियांची चलती चालू आहे. त्याबद्दल कुणाची ओरडा असण्याची काहीच गरज नाही! मात्र अवैध होणारी वाहतूक, अवैध होणारी
साठेबाजी आणि त्यामुळे ग्राहकांची होणारी लूट! याला जबाबदार कोण?? हा मोठा प्रश्न जनसामान्य समोर पडलेला आहे. हा प्रश्न कोण सोडवणार? कारण सर्वच यासंदर्भात मळून आहेत की काय? असे वाटू लागले आहे. कारण कित्येक तक्रारी आल्या कित्येकांनी निवेदने दिली. मात्र कुणीही त्याची दखल घ्यायला तयार नाही!! जो कोणी आवाज उठवेल त्याचा आवाज दाबायला वाळू माफिया सज्ज आहे. हा सर्व प्रकार पाहिल्यास महसूल प्रशासनाचे पुढे आणि राजकारणातील भ्रष्ट व्यक्तीच्या पुढे गोरगरिबांचे काही चालत नाही. असे असले तरीही किमान लोकप्रतिनिधीने याकडे लक्ष द्यावे अशी एक सामान्य अपेक्षा लोक बाळगून असतात.
0 टिप्पण्या