Subscribe Us

header ads

तीन हजाराची लाच घेताना लाचखोर तलाठी एसीबीच्या जाळ्यात



आष्टी : सातबारावर वारसाची नोंद करण्यासाठी ३ हजार रुपयांची लाच घेताना आष्टी तालुक्यातील पिंपळा येथील तलाठी जालिंदर गोपाळ नरसाळे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बुधवारी रंगेहाथ पकडले. एसीबीचा पदभार घेतल्यानंतर डीवायएसी भारत राऊत यांच्या नेतृत्वात ही पहिलीच कारवाई झाली असून राऊत यांनी कारवाईचे खाते उघडले आहे.आष्टी तालुक्यातील पिंपळा येथील सजाचा तलाठी जालिंदर गोपाळ नरसाळे (४९) हा सातबारावर पत्नी व नातेवाईकांचे वारस नोंद करण्यासाठी ३ हजार रुपयांच्या लाचेची मागणी करत असल्याची तक्रार तक्रारदाराने ी एसीबीच्या बीड कार्यालयाकडे केली होती त्याच वेळी पंचासमक्ष लाच मागणीची पडताळणीही केली गेली होती. दरम्यान, यानंतर बुधवारी एसीबीने  आष्टी तहसिल कार्यालयाच्या परिसरात सापळा लावला होता. तहसिल परिसरात तलाठी नरसाळे याने लाच स्विकारताच एसीबीच्या पथकाने त्याला गजाआड केले. पोलिस अधीक्षक राहुल खाडे, अपर अधीक्षक विशाल खांबे, उपअधीक्षक भारत राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक रविंद्र परदेशी, पोलिस निरीक्षक सुनिता मिसाळ, कर्मचारी श्रीराम गिराम, भरत गारदे, हनुमान गोरे यांच्या पथकाने ही कारवाई केली. तलाठी जालिंदर नरसाळे विरोधात आष्टी पोलिसांत लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा