बीड स्पीड न्यूज
शेतकरी आत्महत्या बरोबरच कर्जबाजारी नोकर वर्ग देखील जिल्ह्यात आत्महत्या करत आहेत.अशीच घटना बीड अगारा येथे बस चालक म्हणुन नोकरीला असणारे तुकाराम त्रिंबक सानप (वय ३६) वर्ष यांनी पगार वेळेवर होत नाही. झालेला कर्ज कसे फेडावे पगार वेळेवर नसल्याने घर खर्च कसा चालवयचा घराचे हप्ते कसे फेडायचे पगार वेळेवर नसल्याने लाईट बिल देखील भरले नाही या नैराश्यातून त्याने राहत्या घरी आत्महत्या केली आहे. तुकाराम सानप हे रोजच्या प्रमाणे ड्युटी करून सायंकाळी अंकुश नगर येथील आपल्या घरी परतले आणि घरातच पंख्याचा हुकला दोरी बांधून आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येने बीड शहरात एकाच खळबळ उडाली मयत सानप यांना एक चार वर्षाचा व एक ६ वर्षाचा असे दोन मुले आहेत.तुकाराम सानप याचा अंत्यविधी आज सकाळी 10 वाजता त्याच्या गावी तागडगाव (दगडवाडी खलापुरी रोड फाट्यावरून मध्ये बेंदी) येथे होणार आहे.
0 टिप्पण्या