Subscribe Us

header ads

गेवराई रांजणी प्रकरण; त्या’ महिलेचा आत्याच्या मुलानेच केला खून !, पोलिस तपासात कारण आले पुढे!





गेवराई : प्रतिनिधी_गेवराई जवळ असलेल्या धुळे-सोलापूर महामार्गावरील रांजणी येथील एका नाल्यात महिलेचा सांगडा चार दिवसांपूर्वी आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली होती. या महिलेचा मृतदेह पूर्णपणे सडलेल्या अवस्थेत आढळून आल्याने ओळख सुरुवातीला पटली नव्हती. मात्र पोलिसांनी याबाबत अधिक तपास केला असता सदरील महिला जालना जिल्ह्यातील असल्याचे निष्पन्न झाले होते. राधा माणिक गायकवाड ( वय ३५ ) रा. इंदेवादी ता.जि. जालना असे त्या मयत महिलेचे नाव निष्पन्न झाले होते. दरम्यान सदरील महिलेचा अनैतिक संबंधातून खूनच झाला असून तो तिच्या आत्याच्या मुलानेच केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. जालना येथे खून केल्यानंतर सदरील महिलेचा मृतदेह गेवराई तालुक्यातील रांजणी जवळ आणून टाकून आरोपी फरार झाल्याचे सांगितले जाते. 

खून केल्यानंतर तब्बल आठ दिवसानंतर सदरील महिलेचा सांगडा रांजणी येथे आढळून आला होता.याबाबत अधिक माहिती अशी की, जालना पोलिस ठाण्यात दि.२२ सप्टेंबर रोजी सदरील महिलेची मिसिंगची तक्रार दाखल झाली होती. दरम्यान गेवराई जवळील रांजणी येथे चार दिवसांपासून सदरील महिलेचा सांगडा आढळून आला होता. सुरुवातीला गेवराई पोलिसांसमोर मयत महिलेची ओळख पटविण्याबरोबरच तिचा खून कोणी व कशामुळे केला याचा तपास करण्याचे आव्हान होते. मात्र तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप काळे यांनी तात्काळ तपासाचे चक्रे फिरवून मयत महिलेची ओळख पटवली. तसेच यापुढे कसून चौकशी केली असता सदरील महिलेचा खून हा तिच्याच आत्याच्या मुलाने केला असल्याचे निष्पन्न झाले आहे. दरम्यान हा खूनचा प्रकार अनैतिक संबंधातून घडला असल्याचे देखील समोर आले आहे. आरोपी सुभाष शेरे (रा.हरतखेड ता.अंबड जि.जालना) हा सध्या फरार आहे. आरोपी पकडल्यानंतरच या प्रकरणाचा अधिक उलगडा होईल असे सपोनि संदीप काळे यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा