Subscribe Us

header ads

अतिवृष्टीमुळे हातचे पीक गेल्याने शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

बीड स्पीड न्यूज 

केज प्रतिनिधी_अतिवृष्टीमुळे शेतातील सोयाबीन पिकाचे झालेल्या नुकसानीमुळे खचून जात एका २८ वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास उघडकीस आली. तालुक्यातील साळेगाव येथे ही घटना घडली.तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतात पाणीच पाणी झाल्याने पिके माती सह वाहून गेल्याने शेतातील उभ्या पिकाचे प्रचंड प्रमाणे नुकसान झाल्याने शेतात केलेला खर्च यामुळे आर्थिक संकटात शेतकरी सापडला आहे. तालुक्यातील साळेगाव येथील बालासाहेब रामलिंग गीते हा तरुण शेतकरी या नुकसानीमुळे नैराश्यात होता. यातूनच आज सकाळी साडे नऊ वाजेच्या सुमारास लवण शिवारातील लिंबाच्या झाडाला त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. माहिती मिळताच केज पोलिस ठाण्याचे पोलिस नाईक अशोक गवळी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्याच्या पश्चात पत्नी कोमल ( २४ ) व आदित्य (६ ) व अंजली ( ४) असा परिवार आहे. या घटनांमुळे गावात हळहळ व्यक्त केला जात आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा