Subscribe Us

header ads

कर्जाला कंटाळून वर्षभरातच पित्यापाठोपाठ मुलाचीही आत्महत्या

बीड स्पीड न्यूज 



माजलगाव_  शेतकरी कुटुंबातील 33 वर्षीय युवकाने विषार द्रव्य पिऊन आत्महत्या केली. ही घटना आज सकाळी 6 वाजता तालुक्यातील राजेवाडी येथे घडली. वर्षभरापूर्वी सदरील युवकाच्या पित्यानेही कर्जाला कंटाळून आत्महत्या केली होती.ज्ञानेश्वर बाबुराव महागोविंद  (33 वर्षे) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. या तरुणाकडे असणाऱ्या तीन एक्कर शेतीवर खाजगी बँकेचे कर्ज असल्याची माहिती नातेवाईकांकडून सांगितले जात आहे . कर्जापोटी हा ज्ञानेश्वर अनेक दिवसांपासून त्रस्त होता. परंतु बँकेचे कर्ज शेतातील नापिकीमुळे फिटत नव्हते. यामुळे त्याने आज सकाळी विषारी द्रव्य प्राशन करून आपली जीवनयात्रा संपवली. ही घटना सकाळी आठ वाजता नातेवाइकांच्या लक्षात आली.
वर्षभरापूर्वीच ज्ञानेश्वरच्या वडिलांनीही कर्जाला कंटाळून आत्महत्या केली होती. त्यानंतर आता मुलानेही कर्जाला कंटाळून वर्षभरातच आत्महत्या केल्याने गावभर हळहळ व्यक्त केल्या जात आहे. मयताचा चुलत भाऊ दीपक श्रीरंग महागोविंद यांच्या माहितीवरून दिंद्रुड पोलीस ठाण्यात अकस्मात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा