शहरभर लावले ‘बायको पाहिजे’चे बॅनर
औरंगाबादेतील तरुण रमेश विनायकराव पाटील यांना लॉकडाऊनमध्ये तिसरे अपत्य झाल्या. तीन अपत्य झाल्यामुळे त्यांना मनपा निवडणूक लढता येणार नाही. मात्र त्यांना निवडणूक लढवण्याची खूप इच्छा आहे. त्यासाठी त्यांनी थेट शहरभर बायको पाहिजे असे लिहलेले बॅनर लावले आहे. या बॅनरसोबत त्यांनी बायको कशी असवी हेसुद्धा लिहले आहे. पाटील यांचा प्लॉटिंग चा व्यवसाय आहे. त्यांच्या याच बॅनरची सगळीकडे चर्चा होत आहे.
उमेदवार बायको पाहिजे, बायको कशी असावी ?
रमेश पाटील यांनी लिहलेले बॅनर अतिशय मजेदार आहे. त्यांनी बॅनरवर पत्नीचे वय तसे च ती कशी असावी याविषयी सविस्तर लिहले आहे. मला तीन मुले असल्यामुळे मी निवडणूक लढवू शकत नाहीये. त्यामुळे निवडणूक लढवण्यासाठी मला उमेदवार बायको पाहिजे. जातीची अट नाहीये. मुलीचे वय 25 ते 40 वर्षादरम्यान असावे. विधवा तसेच घटस्फोटीत मुलगीदेखील चालेल. लग्नासाठी उत्सुक असलेल्या मुलीला दोनपेक्षा जास्त अपत्य नसावे,’ असे पाटील यांनी त्यांच्या बॅनरमध्ये लिहले आहे. तशा अटी त्यांनी सांगितल्या आहेत. सध्या या बॅनरची औरंगाबाद मध्ये खूपच चर्चा आहे
0 टिप्पण्या