Subscribe Us

header ads

जून ते सप्टेंबर 2021 मधील अतिवृष्टीच्या अनुदानाचे उर्वरित 25% प्रमाणे राज्य शासनाकडून वितरण

बीड स्पीड न्यूज 



जून ते सप्टेंबर 2021 मधील अतिवृष्टीच्या अनुदानाचे उर्वरित 25% प्रमाणे राज्य शासनाकडून वितरण

पालकमंत्री धनंजय मुंडेंचा शब्द ठरला खरा, बीड जिल्ह्यास आणखी 142 कोटी 31 लाख रुपये मदत प्राप्त

तातडीने होणार मदतीचे वितरण

बीड (दि. 17) ---- : महाराष्ट्रातील बहुतांश भागात जून ते सप्टेंबर 2021 मध्ये झालेल्या अतिवृष्टीच्या नुकसानभरपाई पोटी राज्य शासनाने  वाढीव दराने उर्वरित मदत वितरित करण्याचा शासन आदेश महसूल व वन विभागाच्या वतीने जारी केला असून, याव्दारे राज्यातील सर्व जिल्ह्यात मिळून 1035 कोटी 14 लाख रुपये वितरित करण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली आहे. यापैकी मराठवाड्यात सर्वाधिक मदत बीड जिल्ह्यात मिळाली असून बीड जिल्ह्यासाठी 142 कोटी 31 लाख रुपये मदतीपोटी विभागीय आयुक्त कार्यालयास प्राप्त झाले आहेत.बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी नुकतेच 26 जानेवारी, प्रजासत्ताक दिनी केलेल्या भाषणात अतिवृष्टी अनुदानाची उर्वरित 25 टक्के मदत मिळवून देण्याचा शब्द दिला होता. हा शब्द खरा ठरला असून जिल्ह्यास सर्वाधिक 142 कोटी 31 लाख रुपये मदत प्राप्त झाली असून जिल्हा प्रशासनाने संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर तातडीने वितरित करण्याची प्रक्रिया सुरू करावी, असे निर्देशही श्री. मुंडे यांनी जिल्हा प्रशासनास दिले आहेत.खरीप हंगामात पिके ऐन बहरात असताना बीड जिल्ह्यात व मराठवाड्यात पावसाने आकांडतांडव केला होता. सातत्याने झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीपिकांचे अतोनात नुकसान झाले होते. त्यावेळी पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी शेतकऱ्यांना बांधावर जाऊन दिलासा देण्यासाठी तब्बल 16 वेळा दौरा केला होता.त्यानंतर मुंबई येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना तसेच औरंगाबाद येथे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना धनंजय मुंडे यांनी भेटून बीड जिल्ह्यातील परिस्थितीची माहिती अवगत करून देत, जिल्ह्यास भरीव निधी देण्याची मागणी केली होती. त्यानुसार राज्य शासनाकडून जाहीर झालेल्या विशेष आर्थिक पॅकेज मधून बीड जिल्ह्यात नुकसानीच्या 75% प्रमाणे 502 कोटी रुपये मदत मिळाली होती. तर आता उर्वरित 25% वाढीव दराने 142 कोटी रुपये मंजूर करून वितरित करण्यात आले आहेत.पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या वतीने मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तसेच महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व महाविकास आघाडी सरकारचे आभार मानले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा