Subscribe Us

header ads

आशिया खंडातील अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालय व महाविद्यालयातील अधिकारी,डाॅक्टर, कर्मचारी वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी

बीड स्पीड न्यूज 


आशिया खंडातील अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालय व महाविद्यालयातील अधिकारी,डाॅक्टर, कर्मचारी वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी

अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीच्या वतीने आरोग्य प्रशासनाला बदलीची मागणी

अंबाजोगाई प्रतिनिधी:- आशिया खंडातील सर्वात मोठे ग्रामीण रुग्णालय, महाविद्यालय ओळखण्या जाणाऱ्या अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालय व महाविद्यालयातील वर्ग-१ व वर्ग-२ मधील अधिकारीयांची,डाॅक्टर तीन वर्षांनी तर वर्ग-३ च्या कर्मचाऱ्यांची पाच आणि वर्ग-४ कर्मचाऱ्यांची सात वर्षांनी बदली करण्याचे शासनाचे नियम आहे.परंतु येथील रुग्णालय-महाविद्यालयातील अधिकारी,डाॅक्टरांची गेल्या सतरा वर्षांपासुन राजकिय दबावाखाली एकाच खुर्चीवर चिटकुन बसलेले आहेत.नियमानुसार बदली करण्याचे आदेश असतांना देखील बदली का करण्यात आले नाही असा प्रश्न उपस्थित होतो एकाच ठिकाणी वर्षानुवर्ष काम करीत असल्याने संबंधित अधिकारी, वैद्यकीय अधिक्षक डाॅक्टर राकेश,एचओडी डाॅ.बगाते,एचओडी डाॅ.धपाटे,पि.एम विभागातील डाॅ.कचरे,डाॅ.धहिरे,डाॅ.चव्हाण,मेडिसीन विभागातील एचओडी डाॅ.बिराजदार यांचा मनमानी सुरुच आहे. यामागचं``अर्थकारण``असाव हे मर्जीतील अधिकारी,डाॅक्टर असल्याने त्यांचा बदली बाबतचा विचार केला जात नाही याकडे आरोग्य प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे. परंतुअधिकारी,डाॅक्टर ,कर्मचारी राजकिय दबाव वापरुन एकाच ठिकाणी ठाणं मांडुनआहेत.त्यांना प्रशासनाकडुन पाठिशी घातले जाते प्रशासन मोठ्या प्रमाणात आरोग्य विभागातील डाॅक्टर, अधिकारी कर्मचारी यांच्या बदल्या करत असल्याचे चित्र सध्या निर्माण झाले आहे. त्यामुळे ठाणं मांडुन बसलेल्या अधिकारी,डाॅक्टर कर्मचारी यांना सुट न देता सर्वांच्या सरसकट बदल्या करण्यात यावेत अशी मागणी अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीच्या वतीने होत आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा