बीड स्पीड न्यूज
यात्रेसाठी कावडीने पाणी आणण्यासाठी गेलेल्या दोन युवकांचा गोदावरीत बुडून मृत्यू
गेवराई-:गावातील ज्योतिबा यात्रेसाठी गंगेतून कावडीने पाणी आणण्यासाठी गेलेल्या दोन तरुणाचा गोदावरी नदीच्या पात्रात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. हि घटना गेवराई तालुक्यातील राजापूर याठिकाणी आज शनिवारी रोजी सकाळी घडली. मोहन नाना आतकरे (वय 18 वर्ष) व शिवाजी ज्ञानदेव इंगोले (वय 18 वर्ष) दोघे रा. निपाणी जवळका ता.गेवराई जि.बीड असे नदीपात्रात बुडून मृत्यू झालेल्या युवकांची नावे आहेत.गेवराई तालुक्यातील निपाणी जवळका याठिकाणी श्रीक्षेत्र ज्योतिबा मंदिर आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील येथे भव्य यात्रा भरते.
दरम्यान आज सकाळी गावातील दोघे तरुण गोदावरी नदीच्या काठी असलेल्या राजापूर याठिकाणी कावडीने पाणी आणण्यासाठी गेले होते. दरम्यान त्याठिकाणी हे तरुण गंगेत स्नान करत असताना मोहन नाना आतकरे (वय 18 वर्ष) व शिवाजी ज्ञानदेव इंगोले या दोघांचा नदीपात्रात बुडून दुर्देवी मृत्यू झाला. तर घटनेची माहिती मिळताच तलवाडा पोलिस ठाण्याचे सपोनि प्रताप नवघरे यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेऊन दोन्ही मृत युवकांचे मृतदेह ग्रामस्थांच्या मदतीने वर काढले. तसेच घटनेचा पंचनामा करुन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी गेवराई उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. या दुर्दैवी घटनाने निपाणी जवळका ग्रामस्थांवर शोककळा पसरली आहे.
0 टिप्पण्या