बीड स्पीड न्यूज
रेखाताई क्षीरसागर अनंतात विलीन; हजारोंच्या साश्रुनयनांनी दिला अखेरचा निरोप
बीड: बीड विधानसभा मतदारसंघाचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्या मातोश्री तसेच गजानन सहकारी कारखान्याचे चेअरमन रविंद्र क्षीरसागर यांच्या पत्नी यांचे काल (दि.२०) रोजी दुःखद निधन झाले होते.त्यांच्या पार्थिव देहावर आज (दि.२१) रोजी अंत्यसंस्कार
करण्यात आले.त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी हजारोंची गर्दी झाली होती.यावेळी त्यांना टाळ-मृदंगाच्या गजरात अखेरचा निरोप देण्यात आला.बीड जिल्हा परिषदेच्या सदस्या तसेच नवगण राजूरी गावच्या सरपंच
राहीलेल्या रेखाताई क्षीरसागर यांचे बुधवार (दि.२०) रोजी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुखःद निधन झाले होते.त्यांचा स्वभाव अध्यात्मिक व अतिशय प्रेमळ असल्यामुळे त्या सर्वदूर परिचित होत्या.त्यांच्या पार्थिवाला त्यांचे जेष्ठ सुपुत्र
आ.संदीप क्षीरसागर यांनी अग्नी दिला.पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी रेखाताई क्षीरसागर यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेऊन त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.यांच्यासह आ.प्रकाश सोळंके,आ.अमरसिंह
पंडित,आ.बाळासाहेब आजबे,आ.विनायकराव मेटे, प्रभारी जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुरेश साबळे, प्रभारी पोलिस अधीक्षक सुनील लांजेवार,राजेश्वर चव्हाण, अनिल जगताप,राजेंद्र म्हस्के,सुरेश नवले,पप्पु कागदे,माजी
आ.सुनील धांडे, माजी आ.सय्यद सलीम, माजी आ.उषाताई दराडे,माजी आ.पृथ्वीराज साठे, ॲड.शफीक सय्यद, रामकृष्ण बांगर,अशोक हिंगे, अक्षय मुंदडा, रमेश आडसकर,सुशीलाताई मोराळे, सर्जेराव तांदळे, बाळासाहेब पिंगळे,गवते बापू,मदन जाधव आदी जिल्हाभरातील मान्यवरांनी अंत्यदर्शन घेऊन श्रद्धांजली अर्पण केली.यावेळी लोक अंत्यविधीसाठी जिल्हाभरातून लोक आले होते.
0 टिप्पण्या