बीड स्पीड न्यूज
प्रतिनिधी नवनाथ गोरे
शेती साठी योग्य पाऊस पडावा या साठी महादेवाला साकडे
वाकनाथपुर प्रतिनिधी-: बीड जिल्हात या वर्षी काही भागात आणखीन पाऊसाचे आगमन झाले नाही आणखीन काही भागात पेरणी झालेली नाही जुन महिना संपत आला तरी शेती उपयुक्त पाऊस आणखीन झालेला नाही. या कारणाने बळीराजा खुप चिंतेत आहे. शेतकऱ्यांचे सर्व कुटूंब सर्व शेतीवर अवलंबून असते आणि शेती पिकली नाही तर शेतकरी कर्ज बाजारी
होतात. याचं बळीराजावर कोणतेही संकट येऊ नये या साठी आज दिनांक २६ जुन रोजी बीड तालुक्यातील मौजे ब्रहानपुर येथे शेतकरी महिलांनी पाण्याच्या घागरी भरून गावातील महादेवाच्या मंदिरात अभिषेक घालुन पाऊस पाडण्यासाठी साकडे घातले. या वेळी गावातील महिलांनी वाजत गाजत पाणी घेऊन मिरवणूक करत भरपूर पाऊस पडला आणि शेतकर्याचे पीक जोमात यावे या साठी प्रथना केली.
0 टिप्पण्या