Subscribe Us

header ads

विद्यार्थ्यांनी स्वतःशी प्रमाणिकपणे रहावे; केंद्रीय पोलीस सब इन्स्पेक्टर मिलिंद कसबे यांनी साधला विद्यार्थ्यांशी संवाद

बीड स्पीड न्यूज 



विद्यार्थ्यांनी स्वतःशी प्रमाणिकपणे रहावे; केंद्रीय पोलीस सब इन्स्पेक्टर मिलिंद कसबे यांनी साधला विद्यार्थ्यांशी संवाद


बीड / प्रतिनिधी-: कोणतेही यश गाठण्यासाठी सातत्याचा नियम अतिशय महत्वाचा आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांची तयारी करत असताना, सातत्य आणि स्वतःशी प्रमाणिकपणे रहावे.असे प्रतिपादन केंद्रीय पोलीस सब इन्स्पेक्टर मिलिंद कसबे, दिल्ली  यांनी व्यक्त केले. बीड शहरातील सावंत प्लाझा, मित्र नगर चौकाजवळ शिवाजी नगर येथे बार्टी मार्फत सुरु असलेल्या सम्राट प्रतिष्ठान संचलित छत्रपती राजर्षी शाहू स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र येथे पोलीस भरती बॅचच्या विद्यार्थ्यांसाठी सोमवार  (ता ६) रोजी मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना मिलिंद कसबे बोलत होते.यावेळी सम्राट प्रतिष्ठान संचलित छत्रपती राजर्षी शाहू स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे केंद्र प्रमुख यशवंत वाव्हळकर, दैनिक पुण्यभूमीचे कार्यकारी संपादक सुनिल डोंगरे आदींची प्रमुख उपस्थिती होती.पुढे बोलताना मिलिंद कसबे म्हणाले की,अभ्यासात सातत्य ठेवले तर कोणत्याही परीक्षेत यश मिळविणे अवघड नाही. सर्वसामान्य विद्यार्थी सुध्दा युपीएससी एमपीएससी परीक्षेत यश मिळवू शकतो. प्रत्येक विद्यार्थ्यांने अभ्यासात सातत्य ठेवून पूर्ण कार्यक्षमतेने प्रयत्न करावेत आणि एखाद्या आयटी कंपनीत काम करण्यापेक्षा शिक्षक, प्राध्यापक, शासकीय कर्मचारी, प्रशासकीय अधिकारी बनून देशसेवा करावी. स्पर्धा परिक्षांची तयारी करीत असताना प्रचंड आत्मविश्‍वास ठेवावा. एवढेच नाही तर विद्यार्थ्यांनो स्वत:शी प्रामाणिकपणा ठेवून स्पर्धा परिक्षांचा अभ्यास करावा. त्याचबरोबर आवांतर वाचणावर देखील अधिक भर द्याव. नूसते आवांतर वाचन करून भागणार नाही तर त्याच्या नोट्स काढायला शिका. कारण या खडतर प्रवासतूनच एक दिवस तुमच्या आयुष्यात असा नक्कीच येईल की,तुम्ही यशाची गोड फळे नक्की चाखाल. विद्यार्थ्यांनो प्रशासन सेवेत रूजु  झाल्यावर कुशल प्रशासक म्हणून नावलौकिक मिळवा. तसेच आपले पद सदैव समाजाच्या कामी आले पाहिजे, असे कार्य नेहमी करीत राहावे.असे प्रेरणादाई मत मिलिंद कसबे  यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना व्यक्त केले.या कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रा.अमोल क्षीरसागर व सुत्रसंचलन प्रा.भरत खेत्री यांनी केले.आभार प्रा. शिवाजी रुपनर यांनी व्यक्त केले.या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सम्राट प्रतिष्ठान संचलित राजर्षी शाहू स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन केंद्राचे केंद्र सहाय्यक प्रा.अविनाश वडमारे, कार्यालयीन कर्मचारी ग्रंथपाल सचिन काकडे, प्रा.प्रतिक्षा हिवरकर, प्रा. देवेंद्र कांबळे, विनोद जोगदंड, मुकेश निसर्गंध, दिपक वाघमारे यांनी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा