Subscribe Us

header ads

उमापुर परीसरात वाढले वादविवादाचे प्रकरण , पोलीस प्रशासनाने लक्ष देण्याची गरज..

बीड स्पीड न्यूज 

उमापुर परीसरात वाढले वादविवादाचे प्रकरण , पोलीस प्रशासनाने लक्ष देण्याची गरज.. 

उमापुर | प्रतिनिधी -: गेवराई तालुक्यातील उमापुर हे मोठी बाजार पेठ असलेल गाव आहे. मोठी बाजारपेठ असल्यामुळे गावा जवळील तांडे, वस्त्या, वाड्या वरील लोक उमापुर येथे यांची सारखी वर्दळ असते.उमापुर फाटा येथे लोंकाची चांगलीच वर्दळ होत असुन, येथे पेणारे ,खाणारे नशेत असणारे भरपुर असतात, काही शुल्लक कारणावरुन तर काही शेतीच्या वादातवरुन, तर काही जुन्या वादावरून नेहमी काहीना काही किरकोळ कारणावरुन कोणाचे कोणाचे भांडण होत आहेत. 
उमापुर फाटा या परिसरात नेहमीच वाद होत असतात. या भागात नशा करणाऱ्या तरुणांच्या टोळीचा सुद्धा वावर असतो, यामुळे स्थानिक रहिवासी, व्यावसायिक सुद्धा कंटाळले आहेत.या परीसरात  टवाळखोर पणा कायदा व सुव्यवस्था भंग करणार्यांना पोलीस प्रशासनाकडून कायद्याचे ज्ञान देवुन चांगला चोप देण्यात यावा अशी मागणी परीसरातील नागरीक करत आहेत..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा